नाशिक

उज्वला  पुन्हा चुलीकडे!

महिलांच्या गेट टुगेदरमध्ये
चुलीवर पदार्थ करण्याची क्रेझ

 

नाशिक (NASHIK) ः प्रतिनिधी
चुलींतून निघणार्‍या धुरामुळे प्रदूषण होते.  चुलीत वापरल्या जाणार्‍या लाकडांमुळे जंगलाची तोड होते.  शिवाय धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन डोळ्यांवरही परिणाम होतो. चुलीचा वापर करणारा वर्ग सामान्य असल्याने ते गॅस खरेदी करू शकत नाही, अथवा भरू शकत नाही.  म्हणून उज्वला गॅस योजना सरकारने आणली. चुल जाऊन गॅसचा वापर होण्याची अपेक्षा होती.  या योजनेला एकीकडे प्रतिसाद मिळाला असताना शहरवासीयांना मात्र आता चुलीची भुरळ पडल्याने उज्वला आता गॅसकडून पुन्हा चुलीकडे वळली आहे.  हॉटेलमध्ये (Hotel) चुलीवरच्या खाद्यपदार्थांची क्रेझ निर्माण झाली असतानाच आता महिलांच्या गेट टुगेदरमध्येही किचन ओट्यावर ही आधुनिक चुल पोहोचली आहे.चुलीच्या वापरामुळे होणार्‍या त्रासापासून महिलांना  मुक्ती मिळावी यासाठी पंतप्रधान योजनेअंतर्गत उज्वला योजनेद्वारे गॅस कनेक्शनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु चुलीवरच्या पदार्थांना विशिष्ट खमंग चव असल्याने खवय्यांची पसंती मिळत आहे. परिणामी महिलांही विशेष प्रसंगी किंवा आठवड्यातील एक दिवस गॅसला सुटी देवून चुलीवरच्या जेवणाचा बेत आखत आहे.

 

 

 

जिल्ह्यात चुलीवरच्या मिसळपासून ते आइस्क्रीम, चहा आणि विविध व्हेज नॉनव्हेज पदार्थांची मोठी क्रेझ आली आहे. अनेक हॉटेल्स आणि ढाब्यांवर मोठ मोठे ङ्गलक लावले जात आहे.प्रवासादरम्यान किंवा वीकेंडला खास चुलीवरच्या पदार्थांवर ताव मारला जात आहे.

 

हेही वाचा: महिला वारकऱ्यांना मिळणार या सुविधा

शहर आणि उपनगरांमध्ये विविध महोत्सवांमध्ये खाद्य पदार्थांचे स्टॉल्स् लावले जात आहेत.  त्यात विशेषतः चुलीवरचे पदार्थ आणि खापरावरील मांडे यांना विशेष पसंती दिली जात आहे.
महिलांच्या भिशी पार्टी किंवा वीकेंड, सहलीमध्येही आवर्जून चुुलीवर स्वयंपाक करून बालपणीच्या भातुकलीची आठवण मोठेपणी चुलीच्या निमित्ताने काढली जात आहे.  चुलीवर स्वयंपाक करणे जुन्या जाणत्या महिला सफाइदारपणे करीत असे.आताच्या पिढीतील मुली महिलांना चूल पेटविण्यापासून ते चुलीतील जाळ कमी जास्त कसा करावा, पदार्थ कच्चा किंवा जळायला नको यासाठी जाणकार महिलांकडून मार्गदर्शन घेतले जात आहे. चुलीसाठी मातीपासून तयार केलेली किंवा तीन दगडांची चूल वापरली जात असे.आताही लग्नात मातीची खेळण्यातील किंवा खरोखरची मोठी चूल भेट दिली जाते.चुलीबरोबर पारंपारिक पाटा वरवंटाचा वापरही कमी झाला होता.गॅस कनेक्शन, मिक्सर ने जागा वेळ आणि कष्ट कमी झाल्याने महिलांना होणारे त्रास कमी झाले. मात्र, आता पुन्हा जुन्या साधनांचाच वापर वाढीला लागल्याचे
चित्र आहे.

 

हेही वाचा:खड्डा चिकनची शहरात वाढती क्रेझ
Ashvini Pande

Recent Posts

छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन*

*छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन* नाशिक: प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री…

20 hours ago

संडे अँकर: कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका

कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

21 hours ago

अखेर कृषिमंत्री कोकाटे यांनी मागितली शेतकऱ्यांची माफी

नाशिक: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री…

21 hours ago

पंचवटीतील पोलिसावर निलंबनाची कारवाई

अंमली पदार्थ विकणार्‍यांशी कनेक्शन उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस…

1 day ago

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

3 days ago

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

4 days ago