नाशिक शहर

पाणी काटकसरीने वापरण्याचे, नारायणबापू सोसायटीचे आवाहन

नाशिकरोड:- नाशिक महानहगपालिकेने केलेले नियोजन आणि उन्हाळ्याची तीव्रता पाहता नारायणबापू
नगर सोसायटीच्या सभासदांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे कळकळीचे आवाहन चेअरमन
रितेश गांगुर्डे आणि संचालक मंडळाने केले आहे.
एप्रिल अणि मे या महिन्यांत पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असून,
सोसायटीच्या वतीने तसेच नियोजन करण्यात आले आहे. पाणीटंचाई जाणवणार नाही, यासाठी प्रयत्न
करण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गांगुर्डे यांनी केले आहे.
घरातील पाणी भरुन झाल्यावर नळ बंद करावा, पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, कोठे पाणी वाया
जात असेल, तर सोसायटीला त्वरित कळवावे, सर्वांना पाणी मिळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन
चेअरमन आणि संचालक मंडळाने केले आहे.
गेल्या काही महिन्यापासून पाणी पुरवठा सोसायटीने सुरळीतपणे पाणीपुरवठा केला. आता
महापालिकेकडून पाणी कमी प्रमाणात येत असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थकबाकीदार सभासदांनी थकबाकी त्वरित (३१ मार्च अखेर) भरावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Team Gavkari

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago