नाशिकरोड:- नाशिक महानहगपालिकेने केलेले नियोजन आणि उन्हाळ्याची तीव्रता पाहता नारायणबापू
नगर सोसायटीच्या सभासदांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे कळकळीचे आवाहन चेअरमन
रितेश गांगुर्डे आणि संचालक मंडळाने केले आहे.
एप्रिल अणि मे या महिन्यांत पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असून,
सोसायटीच्या वतीने तसेच नियोजन करण्यात आले आहे. पाणीटंचाई जाणवणार नाही, यासाठी प्रयत्न
करण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गांगुर्डे यांनी केले आहे.
घरातील पाणी भरुन झाल्यावर नळ बंद करावा, पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, कोठे पाणी वाया
जात असेल, तर सोसायटीला त्वरित कळवावे, सर्वांना पाणी मिळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन
चेअरमन आणि संचालक मंडळाने केले आहे.
गेल्या काही महिन्यापासून पाणी पुरवठा सोसायटीने सुरळीतपणे पाणीपुरवठा केला. आता
महापालिकेकडून पाणी कमी प्रमाणात येत असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थकबाकीदार सभासदांनी थकबाकी त्वरित (३१ मार्च अखेर) भरावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…