नाशिकरोड:- नाशिक महानहगपालिकेने केलेले नियोजन आणि उन्हाळ्याची तीव्रता पाहता नारायणबापू
नगर सोसायटीच्या सभासदांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे कळकळीचे आवाहन चेअरमन
रितेश गांगुर्डे आणि संचालक मंडळाने केले आहे.
एप्रिल अणि मे या महिन्यांत पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असून,
सोसायटीच्या वतीने तसेच नियोजन करण्यात आले आहे. पाणीटंचाई जाणवणार नाही, यासाठी प्रयत्न
करण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गांगुर्डे यांनी केले आहे.
घरातील पाणी भरुन झाल्यावर नळ बंद करावा, पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, कोठे पाणी वाया
जात असेल, तर सोसायटीला त्वरित कळवावे, सर्वांना पाणी मिळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन
चेअरमन आणि संचालक मंडळाने केले आहे.
गेल्या काही महिन्यापासून पाणी पुरवठा सोसायटीने सुरळीतपणे पाणीपुरवठा केला. आता
महापालिकेकडून पाणी कमी प्रमाणात येत असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थकबाकीदार सभासदांनी थकबाकी त्वरित (३१ मार्च अखेर) भरावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…