उपयोग…खरं तर जटील प्रश्न!!! कुणाचा उपयोग कशासाठी कोण कशाप्रकारे कधी संधी साधून स्वतः च्या स्वार्थासाठी उपयोग करून घेईल. याचा कुणीच तर्क लावु शकत नाही. आपण कल्पना करु शकत नाही. इतका उपयोग खुप गोष्टींचा असतो. तो कशाप्रकारे करायचा, कशासाठी करायचा, कुणासाठी करायला हवा. हे ठरवता आले पाहिजे. याचा विवेक साधता यायला पाहिजे.
 पुस्तकांचा, उपकरणांचा, वस्तुंचा, पशुंचा, पक्षांचा, निसर्गाचा, माणसांचा अगणित गोष्टींचा उपयोग दैनंदिन प्रत्येकाच्या जीवनात काही अमुलाग्र बदल घडवत असतात. आपल्या नकळत आयुष्य सुखकर करण्यासाठी माणसा इतका स्वार्थी दुसरा कुणीही नाही. प्रत्येक गोष्टीचा उपयोग माणसानं स्वतःसाठी करुन घेतला आहे.
 पुस्तकांच्या वाचनाचे उपयोगाचे किती तरी फायदे आहेत. बर्याच वेळा असं म्हणतात की वाचाल तर वाचाल!!! खरं तर पुस्तके माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात…असं वाचताना आले. माहित नाही हा विचार कुणाचा पण विचार करायला लावणारी उपयोगी गोष्ट इतकं नक्कीच…
आधुनिकता प्रचंड वेगाने वाढत आहे. सर्व काही आता क्षणार्धात मिळते आहे. पुर्वीच्या जुन्या वस्तूंची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या वस्तूंनी भरलेली आहे. जुन्या गोष्टींचा आता तितका उपयोग होत नाही. फार फार तर शोभेसाठी आपण त्या गोष्टी आपल्याजवळ हव्यात म्हणून त्यांना काय ते जीवनात स्थान…
पशु आणि पक्षी यांचा ही उपयोग करून मानवजातीने आपला विकास साधला आहे. आजही शेती ही बैलांच्या साह्याने केली जाते. घोडागाडी, बैलगाडी यांचा उपयोग हा उदरनिर्वाहासाठी काही ठिकाणी आहे. पक्षांचा उपयोग पुर्वी पासुन पत्रव्यवहारासाठी केला जात होता…
  पण आधुनिकतेमुळे आता शत्रुवर नजर ठेवण्यासाठी पक्ष्यांच्या डोक्यावर अगदी छोट्या कॅमेरा मार्फत नजर ठेवण्यात येते. मन आणि डोकं एकाच वेळी स्तब्ध व्हावे इतकी ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे…कोण कुणाचा कुठल्या प्रकारचा काय वापरुन उपयोग करून घेईल याचा विलक्षण उदाहरण!!!
निसर्ग आपल्याला फक्त देतच आलाय…मग तो  तेजस्वी सुर्य प्रकाश असो, चंद्राची शितलता, निर्मळ पाणी, सुखद वार्याची झुळूक, शहारा आणणारी थंडी आणि बरंच काही…निसर्गाकडून आपण फक्त घेतच आलो आहोत. निसर्ग आपल्यावर निस्वार्थी आणि दुजा भाव नसलेलं प्रेम करते. त्याचा उपयोग सांगायला कदाचित सगळेच असमर्थ असतील…
माणसांचा उपयोग माणसानं इतका कुणीच करुन घेतला नसेल. घर बांधताना असंख्य कारागिरांना मदतीला घ्यावे लागते. खरं तर कुठलीच महान गोष्ट माणुस एकटा करु शकत नाही‌. अल्प तरी सहाय्यक मदतीला वेळेला उपयोगी पडतातच.
८४ लाख पशु पक्षी किटक यांच्या पेक्षा वेगळे असे माणसाला निसर्गानं आणि ईश्वरी शक्तीने बुध्दी आणि हास्य दिले आहे. तिचा उपयोग कसा करायचा हे ज्याचं त्यानं ठरवावं… बुध्दीने एखाद्याला अडचणीत पण आणु शकतो आणि त्याच बुद्धीचा योग्य उपयोग करून अडचणीतुन बाहेर येऊ शकतो. असं महान लोक सांगतात. हे ही ऐकण्यात आले आहे.
आयुष्यात स्वतःच्या स्वार्थाचा, कुणाच्या साधेपणाचा, कुणाच्या उदार वागण्याचा, कुणाला बेअक्कल, खोटं ठरवण्यासाठी अशा असंख्य गोष्टीसाठी माणुस माणसांचा, वेळेचा, चतुर स्वभावाचा ई. उपयोग करून घेतो‌.
 माणसांचा उपयोग भगवंताने सुध्दा वेळोवेळी करून घेतला आहे. आयुष्य कसं जगायचं. आदर्श जीवनशैली कशी असावी हे विश्वाला सांगण्यासाठी अर्जुनाला निवडलं. दैवी शक्ती सदैव फक्त विश्व कल्याणाचा विचार करतात.
शब्दांचा उपयोग विचारपुर्वक हवा. शब्दच आधार होतात तर कधी शब्दाला धार असते. उच्चार करताना सुद्धा योग्य आविर्भाव असेल तर त्या भावना व्यक्त करण्याचा उपयोग नाही तर सारं काही व्यर्थ!!!
आयुष्यात असंख्य सात्विकतेचा उपयोग जर केला तर आयुष्य सुंदर, सुखकर, स्पष्ट, नितळ होईल आणि निसर्गाच्या उपयोगी आपली काया यावी हीच काय ती धन्यता आणि नश्वर देहाचा उपयोग!!!
©सौ. श्रध्दा जाधव बोरसे
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

8 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

9 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

9 hours ago