आस्वाद

दुःखाची दरी

 

 

प्रत्येकाला काही ना काही दुःखाने ग्रासले आहे. सर्व काही असूनही माणूस कधीच समाधानी नसतो. माणसाच्या मनाची तशी अवस्थाच आहे. एक गोष्ट मिळाली, की पुढच्या गोष्टीसाठी त्याच्या मनात इच्छा उत्पन्न होते, आणि इच्छा पूर्ण झाली नाही, की दुःख होतं. दुःख हे दुसऱ्याचं सुख पाहूनही होते, तर कधी आपण इतरांपेक्षा मागे पडलो आहोत. यामुळे दुःखाने ग्रासले जातो.

माणसाला कुठल्या गोष्टीचा दुःख होईल. हे सांगणे आणि माणसाला नक्की कुठल्या गोष्टीचा दुःख आहे. त्याची दुखरी नस कुठली हे कुणीच सांगू शकत नाही. सहवासातील व्यक्तीही त्याच्या मनाचा ठाव घेऊ शकत नाही.

दुःखी असलेली व्यक्ती आपल्या आसपासच्या लोकांनाही दुःख देते. दुःख दुसऱ्याला देतो म्हणूनच कदाचित दुःख मिळत असावं असा बऱ्याच लोकांचा समज असतो पण तसे नाही. काही वेळा इतरांना जास्त सुख वाटल्यामुळे ही आपल्या पदरात दुःख येतं त्यामुळे इतरांना किती सुख वाटावं, कुणाला सुख वाटावं याचा विवेक नक्कीच धरता आला पाहिजे. चांगुलपणा कुठे थांबवायचा हे ही कळायला हवंच.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक तरी अशी वेळ येतेच. जेव्हा त्याला भावनिक आधाराची गरज पडते. ज्या व्यक्तीला जेव्हा कुठुनही आधार मिळत नाही, त्यावेळी निसर्गचं काही वेळा शुध्द मनाच्या जीवांसाठी कुणाला ही माध्यमं बनवून त्या व्यक्तीला दुःखाच्या दरीतुन बाहेर काढते.

दुःख एकमेकांना एकमेकांच्या जवळ आणते, आणि सुख एकमेकांना एकमेकांपासून दूर घेऊन जाते. मग सुख नक्की मित्र की शत्रु… पण एक खरं दुःख भोगल्याशिवाय सुखाची किंमत शुन्यच. जेवणात जसं मीठ गरजेचे तसेच आयुष्यात दुःख ही सुखाची किंमत काय आहे. हे समजण्यासाठीच येत असावं

दुःख कोणाच्याही नशिबात जात नाही, कारण सगळ्यांकडे सहनशक्ती असतेच असं नाही. ज्यांच्या वाट्याला दुःख येतं त्यांना जीवनातील चढ उताराचा, अडचणी, समस्या हाताळताना आयुष्य सुंदरपणे जगण्याचा खरा अर्थ समजलेला असतो. कारण दुःखातच माणुस अधिक आत्मपरीक्षण करत असतो.

ज्यांच्या वाट्याला दुःख येतं तीच व्यक्ती महान होतात. फक्त दुःखाकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यापक असवा. त्यात ही स्विकार महत्वाचा… कारण दुःखाकडून काहीतरी शिकायला मिळत असते.

काही व्यक्ती दुःखाला कुरवाळत नाही. त्याला आपलं मानतात. दुःख, यातना, विवंचना इ. यांना स्विकारतात. पुढे मार्गस्थ होतात. दुःखाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनच वेगळा असतो. आपल अस्तित्व घडवण्याचं काम निसर्ग, ईश्वरी शक्ती दुःखाच्या रूपात करत असते.

इतर लोकांना सगळं काही मिळतं, पण निसर्गाची साथ दैवी शक्तीची साथ मिळत नाही. परंतु जेव्हा बावनकशी सोन्यासारख्या लोकांच्या आयुष्यात दुःख येते, तेव्हा त्यांच अस्तित्व दुःखाने झळाळून निघते.

दुःखातच माणसांचे खरे चेहरे आपण ओळखू शकतो. जेव्हा आपण सांगतो की, मी अडचणीत आहे. तेव्हा खरंच कोण आपल आहे. याची ओळख आपल्याला नव्याने होते. खर तर ती परिक्षा असते माणसाच्या जन्माला येऊन माणुसकी दाखवण्याची… खरोखरच आपली असणारी नाती किती आपली आहे. याची समज दुःख, अडचणीतच येते.

हजार अनुभवांच्या कथांपेक्षा सरळ चालतांना लागलेली ठेच माणसाला आयुष्यभर सरळ आणि चौकस पणाने निरिक्षण, विचार करून पुन्हा सरळ चालायला भाग पाडते.

काही गोष्टी ह्या स्वतः भोगल्यावर किंवा जो पर्यंत स्वतः वर वेळ येत नाही किंवा सोसल्याशिवाय दुःख काय आहे हे कळत नाही. म्हणुन तर म्हणतात ना की, जावे त्यांच्या वंशा…

काही लोक स्वतःच्या प्रारब्धात असलेल्या गोष्टीचा हिशोब ही देवाच्या नावाने लिहिताना दिसतात. सर्वांना माहीत आहेच की मनुष्याच्या रुपात देवाने ही सगळं भोगलेच आहे मग आपली काय गणना???

निसर्गान जर दैवी शक्तीला ही दुःखाची दरी पाहायला लावली तर आपण तर अगदीच पायधूळ आहोत. पण एक नक्की की दुःखाची दरी पार करताना अनेक चांगले वाईट अनुभव येतात आणि मग सुखाचा डोंगर दिसतो. तेव्हा त्याला पाहण्याच सुख अवर्णनीय. शेवटी काय रडून हसण्याची मजाच काही औरच!!!

 

©सौ. श्रध्दा जाधव बोरसे

Ashvini Pande

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

14 hours ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

14 hours ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

14 hours ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

14 hours ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

15 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

15 hours ago