filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 46;
भारत पेट्रोलियमच्या पाइपलाइन गळतीमुळे नुकसानीचा दावा
मनमाड : आमिन शेख
शहरानजीक असलेल्या अनकवाडे हद्दीतील शेतकरी संपत चव्हाण यांच्या विहिरीत डिझेल व पेट्रोल उतरल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारत पेट्रोलियम कंपनीच्या पाइपलाइन गळतीमुळे ते उतरले की, कोणीतरी खोडसाळपणा करून डिझेल-पेट्रोल विहिरीत सोडले, याबाबत शोध सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच भारत पेट्रोलियमच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली व शोधमोहीम सुरू केली. मात्र, सायंकाळपर्यंत या विहिरीत पेट्रोल-डिझेल कुठून आले, हे समजलेच नाही. पेट्रोलियम कंपनीच्या पाइपलाइन गळतीमुळेच विहिरीत इंधन उतरल्याने माझे नुकसान झाल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनमाड येथे इंडियन ऑइल व हिंदुस्थान पेट्रोलियम या इंधन कंपन्यांचे प्लांट आहेत. यात मुंबईवरून थेट मनमाडला पेट्रोल, डिझेल व केरोसीनचा पुरवठा करण्यात येतो. मनमाडनजीक असलेल्या अनकवाडे शिवारात संपत चव्हाण यांच्या शेतालगत भारत पेट्रोलियमची इंधन पुरवठा करणारी पाइपलाइन गेलेली आहे. चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत उन्हाळा असल्याने जेमतेम पाणी शिल्लक आहे. यात जवळपास चार ते साडेचार फूट पेट्रोल व डिझेलचा थर आढळला. याबाबत चव्हाण यांनी पेट्रोलियम कंपनीशी संपर्क साधून माझ्या विहिरीत इंधन उतरल्याचा दावा केला. मात्र, इंधन कंपन्यांकडून ही गोष्ट शक्य नाही. गळती असेल तर अत्याधुनिक मशिनरीद्वारे तत्काळ समजले असते. तरीही सखोल तपास करून निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली.या घटनेची माहिती मिळताच भारत पेट्रोलियम कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली.
सुरुवातीला विहिरीची तपासणी करून तीत उतरलेले पेट्रोल, डिझेल व्ह्यॅक्यूम गाडीद्वारे काढून घेण्यात आले. यानंतर पाइपलाइन व विहिरीच्या आजूबाजूला पोकलेनद्वारे दहा फूट खोल खड्डा खोदून खरोखर पाइपलाइनला गळती आहे का, असेल तर कोणत्या दिशेने पेट्रोल-डिझेल विहिरीत झिरपले, याचा तपास कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून करण्यात येत आहे. पाइपलाइन गळतीमुळे शेतकर्यांचे नुकसान झाले असेल, तर आम्ही भरपाई देऊ, असे अधिकार्यांतर्फे सांगण्यात आले.
भारत पेट्रोलियमने भरपाई द्यावी
मनमाडला भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल, डिझेल व केरोसीन पुरवठा करणारी पाइपलाइन आमच्या शेतातून गेली आहे. याआधी अनेकदा पाइपलाइनला गळती झाली होती. या गळतीमुळेच माझ्या विहिरीत पेट्रोल- डिझेल उतरले. शिल्लक सर्व पाणी दूषित झाले. आम्हाला प्यायला व जनावरांना पिण्यासाठीदेखील आता पाणी नाही. भविष्यात हा प्रकार कधी थांबेल, याची शाश्वती नाही. भारत पेट्रोलियम कंपनीने मला भरपाई द्यावी.
– संपत चव्हाण, शेतकरी
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…