नाशिक

विनातिकीट प्रवाशांविरूद्ध रेल्वे प्रशासनाची विशेष मोहीम

मनमाड : प्रतिनिधी

सध्या जवळपास सर्वच रेल्वेगाड्या धावू लागल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांमधील विरोधात रेल्वे प्रशासनाने मोहीम सुरू केली . मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत १ एप्रिल ते १५ मे या कालावधीत रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने १ लाख ५० हजार २५१ केसेसद्वारे १२ कोटी ४६ लाख ८३ हजार ४३४ रुपये इतकी दंडात्मक वसुली केली . मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी या ४५ दिवसांत रेल्वे प्रशासनाने जवळपास दुप्पट रक्कम वसूल केली आहे . सर्व प्रवाशांनी योग्य रेल्वे तिकिटासह प्रवास करावा , असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे . मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात वाणिज्य विभागाकडून रेल्वेच्या विनातिकीट प्रवास करणे , अनियमिततिकीट यात्रा व तिकिटाचा गैरवापर रोखण्यासाठी १ एप्रिलपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली . भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ . शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य व्यवस्थापक बी . अरुणकुमार , सहाय्यक प्रबंधक अनिल पाठक , विशेष तिकीट तपासणी पथकाचे निरीक्षक वाय . डी . पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिल ते १५ मे २०२२ या कालावधीत तिकीट तपासणी पथकाने भुसावळ विभागात व्यापक मोहीम राबवून वरीलप्रमाणे कोट्यवधी रुपयांची दंडात्मक कारवाई करून फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल केला . मागील वर्षी १ एप्रिल २०२१ ते १५ मे २०२१ या कालावधीत ७७ हजार ९ २३ फुकट्या प्रवाशांकडून ६ कोटी ३० लाख ७६ हजार ९ ८८ रुपयांची रक्कम वसूल केली होती . मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी या ४५ दिवसांत तिकीट तपासणी पथकाने जवळपास दुप्पट रक्कम वसूल केली , अशी माहिती रेल्वे प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली .

Ashvini Pande

Recent Posts

कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले पण खाते बदलले, आता हे खाते

मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…

44 minutes ago

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…

9 hours ago

मालेगाव बॉम्बस्फोट खटला: सर्व आरोपी निर्दोष

नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…

13 hours ago

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी,

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…

1 day ago

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

1 day ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

1 day ago