नाशिक

निवडणुकीतून ताकद दाखवू; सुजात आंबेडकरांचा हुंकार

वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा, कष्टकरीसाठी काम करण्याच्या सूचना

नाशिक : प्रतिनिधी
राज्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद 2019 नंतरच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर कमी झाल्याचे काहीजण म्हणतात. मात्र, वंचित पक्ष पुढार्‍यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा आहे. पक्षाची स्थापना झाल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झालेली नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक फक्त कार्यकर्त्यांची असते. त्यामुळे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित आपली ताकद दाखवेल, असा विश्वास पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केला.
परशुराम साईखेडकर सभागृहात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (दि.12) करण्यात आले होते. यावेळी सुजात आंबेडकर उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे महानगरप्रमुख डॉ. अविनाश शिंदे होते. व्यासपीठावर राजेंद्र पातोडे, दिशा पिंकी, चेतन गांगुर्डे, अरुण जाधव, वामनदादा गायकवाड, शभिमाताई पाटील, महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड, युवा जिल्हाप्रमुख दामोदर पगारे, रवी पगारे, दीपक पगारे, बाळासाहेब शिंदे, दीपचंद दोंदे, संदीप काकळीज, सुनील साळवे, रेखा देवरे आदींसह उपस्थित होते. सुजात आंबेडकर पुढे म्हणाले, ऑक्टोबरमध्ये विधानसभेचा निकाल लागल्यानंतर पक्षाने आपली रणनीती बदलली आहे. यापूर्वी पक्षाची राष्ट्रीय कमिटी नव्हती, ती आता तयार केली आहे. जसे बदल वरच्या पातळीवर झाले. तसेच बदल खालच्या स्तरावर करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्यासाठी काम करायचे आहे. यासाठी वंचितचा कार्यकर्ता शहरातल्या प्रत्येक गल्लीत, खेड्यातल्या प्रत्येक गावात, वाड्यावर असणे आवश्यक आहे. जोपर्यंत तळागाळात आपण जात नाही, तोवर पक्ष ग्राउंड लेव्हलवर जाऊ शकत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, सुजात आंबेडकर यांना ऐकण्यासाठी परशुराम साईखेडकर सभागृह भरून बाहेर गर्दी झाल्याचे चित्र होते.

पक्षवाढीसाठी महत्त्वाचा संदेश

सेल्फी काढून आणि सोशल मीडियावर फोटो टाकून पक्ष चालत नाही. तळागाळात जाऊन जनसामान्यांचे, पीडितांचे प्रश्न तुम्ही जोवर सोडवणार नाही, तोवर पक्षाची वाढ होणार नाही. त्यामुळे पक्षवाढीसाठी काय महत्त्वाचे आहे हे पाहून काम करण्याचा महत्त्वाचा सल्ला सुजात आंबेडकर यांनी दिला. त्यास उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला.

आंबेडकरांनी ‘तो’ दावा खोडून काढला

‘वंचित’ची ओळख आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी हेच मुद्दे हाती घेतल्याचा शिक्का मारला जातो. परंतु, वंचितने आतापर्यंत 2023 चा गायरानबाबतचा मोर्चा, अदानीकडून इलेक्ट्रिसिटीच्या कामास विरोध, कंत्राटी भरती, खासगीकरण, ओबीसी, एसटी आरक्षण यांसह राज्यातील अनेक मुद्यांवर एकट्या वंचितने आंदोलने व मोर्चे काढल्याचे सुजात आंबेडकर यांनी म्हटले. मात्र, आपले काम शेवटच्या घटकापर्यंत जात नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.

 

Gavkari Admin

Recent Posts

नाशिकमध्ये १४ जून रोजी ऑटोमेशन रोड शो; उद्योगांसाठी नवतंत्रज्ञानाचे सादरीकरण”

सिडको विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील उद्योगनगरी नाशिक येथे १४ जून २०२५ रोजी ऑटोमेशन रोड शो या…

13 hours ago

बेरोजगारीच्या खाईत तरुणाई सेवानिवृत्तांना पुन्हा सेवेची मलई

मंत्रालयासह अनेक शासकीय ठिकाणी कंत्राटी भरतीला प्राधान्य देणार्‍या राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतल्याचे…

19 hours ago

फडणवीस- राज ठाकरे भेटीने नव्या समीकरणांची चर्चा

मुंबई : उद्धव सेना ही राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करण्यास उत्सुक असल्याच्या बातम्या काही दिवस…

19 hours ago

जिल्हा परिषदेत नवीन रचनेनुसार 74 गट, 148 गण

2017 च्या गट व गण रचनेप्रमाणे 2025 ची निवडणूक होणार नाशिक : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य…

19 hours ago

वारकर्‍यांच्या सेवेसाठी छावाचा अनोखा उपक्रम

चार पाण्याचे टँकर आणि डॉक्टरांसह रुग्णवाहिका नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचा केंद्रबिंदू असलेल्या संतश्रेष्ठ…

19 hours ago

पोलिसांकडून आरोपींच्या बचावाची भूमिका

मंत्री भुसे, ग्रामस्थांचा आरोप; टेहरेजवळील अपघातात डॉक्टर ठार, तीन जखमी मालेगाव : प्रतिनिधी मुंबई-आग्रा महामार्गावरील…

19 hours ago