नाशिक

निवडणुकीतून ताकद दाखवू; सुजात आंबेडकरांचा हुंकार

वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा, कष्टकरीसाठी काम करण्याच्या सूचना

नाशिक : प्रतिनिधी
राज्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद 2019 नंतरच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर कमी झाल्याचे काहीजण म्हणतात. मात्र, वंचित पक्ष पुढार्‍यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा आहे. पक्षाची स्थापना झाल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झालेली नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक फक्त कार्यकर्त्यांची असते. त्यामुळे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित आपली ताकद दाखवेल, असा विश्वास पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केला.
परशुराम साईखेडकर सभागृहात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (दि.12) करण्यात आले होते. यावेळी सुजात आंबेडकर उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे महानगरप्रमुख डॉ. अविनाश शिंदे होते. व्यासपीठावर राजेंद्र पातोडे, दिशा पिंकी, चेतन गांगुर्डे, अरुण जाधव, वामनदादा गायकवाड, शभिमाताई पाटील, महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड, युवा जिल्हाप्रमुख दामोदर पगारे, रवी पगारे, दीपक पगारे, बाळासाहेब शिंदे, दीपचंद दोंदे, संदीप काकळीज, सुनील साळवे, रेखा देवरे आदींसह उपस्थित होते. सुजात आंबेडकर पुढे म्हणाले, ऑक्टोबरमध्ये विधानसभेचा निकाल लागल्यानंतर पक्षाने आपली रणनीती बदलली आहे. यापूर्वी पक्षाची राष्ट्रीय कमिटी नव्हती, ती आता तयार केली आहे. जसे बदल वरच्या पातळीवर झाले. तसेच बदल खालच्या स्तरावर करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्यासाठी काम करायचे आहे. यासाठी वंचितचा कार्यकर्ता शहरातल्या प्रत्येक गल्लीत, खेड्यातल्या प्रत्येक गावात, वाड्यावर असणे आवश्यक आहे. जोपर्यंत तळागाळात आपण जात नाही, तोवर पक्ष ग्राउंड लेव्हलवर जाऊ शकत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, सुजात आंबेडकर यांना ऐकण्यासाठी परशुराम साईखेडकर सभागृह भरून बाहेर गर्दी झाल्याचे चित्र होते.

पक्षवाढीसाठी महत्त्वाचा संदेश

सेल्फी काढून आणि सोशल मीडियावर फोटो टाकून पक्ष चालत नाही. तळागाळात जाऊन जनसामान्यांचे, पीडितांचे प्रश्न तुम्ही जोवर सोडवणार नाही, तोवर पक्षाची वाढ होणार नाही. त्यामुळे पक्षवाढीसाठी काय महत्त्वाचे आहे हे पाहून काम करण्याचा महत्त्वाचा सल्ला सुजात आंबेडकर यांनी दिला. त्यास उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला.

आंबेडकरांनी ‘तो’ दावा खोडून काढला

‘वंचित’ची ओळख आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी हेच मुद्दे हाती घेतल्याचा शिक्का मारला जातो. परंतु, वंचितने आतापर्यंत 2023 चा गायरानबाबतचा मोर्चा, अदानीकडून इलेक्ट्रिसिटीच्या कामास विरोध, कंत्राटी भरती, खासगीकरण, ओबीसी, एसटी आरक्षण यांसह राज्यातील अनेक मुद्यांवर एकट्या वंचितने आंदोलने व मोर्चे काढल्याचे सुजात आंबेडकर यांनी म्हटले. मात्र, आपले काम शेवटच्या घटकापर्यंत जात नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.

 

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

14 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

14 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

14 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

14 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

14 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

15 hours ago