नाशिक शहर

थकबाकी वसुली सुसाट , 144 कोटी जमा

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घरपट्टी व पाणी पट्टी वसुलीचे शंभरटक्के उदिष्ट दिले होते. त्यानंतर करसंकलन विभाग झपाटयाने कामाला लागला असून तब्बल पालिकेने यंदा तब्बल 144 कोटींची वसुली केली आहे. ही वसुली मागील वर्षीपेक्षा अधिक असून गेल्यावेळी थकबाकीची वसुली 115 कोटींवर अडकली होती. परंतु पालिका आयुक्त ॲक्शन मोडवर येताच थकबाकी वसुली सुसाट झाल्याचे चित्र आहे.

करसंकलन विभागाकडून वसुलीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी आजमितिला 115 कोटी घरपट्टी वसूल झाली होती. यंदा हे प्रमाण 144 कोटींवर पोहचली आहे. तर पाणीपट्टी वसुली गतवर्षी 40 कोटी इतकी होती. यंदा हीच वसुली 42 कोटींच्या पुढे गेली आहे. थकबाकी वसुलीसाठी 270 कर्मचार्यांची आवश्यकता असताना कर संकलन विभाग अवघे नव्वद कर्मचार्ऱ्यांवर या मोहिमेची जबाबदारी आहे. यापूर्वी पालिकेने थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बजाओ, सूचनापत्र पाठवणे, नोटिसा धाडणे, जप्तीचे वारंट बजावणे याद्वारे करसंकलन विभाग उदिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करत आहे. आयुक्तांनी चालू आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे दीडशे कोटी तर पाणीपट्टी वसुलीचे 75 कोटींचे उदिष्ट दिले आहेत. त्यापैकी घरपट्टीचे 144 कोटी थकबाकी वसूल केली आहे. गतवर्षी हे प्रमाण 115 कोटी इतकी होती. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 28 कोटींनी जादा आहे. तर पाणीपट्टीचे थकबाकी वसुली 42 कोटी 65 लाखांवर पोहचली आहे. गतवेळेस हे प्रमाण 40 कोटी 30 लाख इतके होते. सध्यस्थितीत दोन कोटी 35 लाखांनी वसुली अधिक आहे. आयुक्तांनी दिलेले उदिष्ट पूर्ण करताना घरपट्टीचे सहा कोटी तर पाणीपट्टिचे 32 कोटी वसूल करण्यासाठी करसंकलन विभागाला घाम गाळावा लागणार आहे. अपुरे मनुष्यबळातही दमदार कामगिरी करत करसंकलन विभाग वसुलीत सुसाट झाल्याचे दिसत आहेे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असून आयुक्तांनी यंदा घरपट्टी व पाणी पट्टी वसुलीचे शंभरटक्के उदिष्ट गाठताना कर संकलन विभागाला मात्र विशेष परिश्रम घ्यावे लागत आहे.  वेळोवेळी आवाहन करुनही थकबाकीदार मालमत्ता कर अदा करत नसल्याने करसंकलन विभागाने 337 जणांना मालमत्ता जप्तीचे वारंट जारी केले आहे. कारवाईच्या भितीपोटी 67 जणांनी पूर्ण व अंशत: 49 लाख 96 हजारांची थकबाकी अदा केली आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

7 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago