जागृती मिशनचे सद्गुरु श्री सुधांशू महाराज यांच्या सत्संगाचा गुरूमंत्र दीक्षा कार्यक्रमाने झाला समारोप …
नाशिक : प्रतिनिधी
जागृती मिशनचे परमपूज्य सद्गुरु श्री सुधांशू महाराज यांचा चार दिवसीय सत्संग कार्यक्रम
ठक्कर डोम एबीबी, सर्कल सिटी सेंटर मॉल जवळ, त्र्यंबक रोड येथे आयोजित करण्यात आला होता. या सत्संगाचा समारोप रविवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता गुरूमंत्र दीक्षाचा कार्यक्रमाने झाला.
आज रविवार , दि २६ सकाळ सत्र १० ते १२ रोजी ध्यान साधना झाली त्यानंतर मंत्रादिक्षा १.०० वाजता संपन्न झाली.
यावेळी विश्वजागृती नाशिक मंडळाचे अध्यक्ष ओंकारसिंग राजपूत, उपाध्यक्ष गोविंदराव कोठावळे, अजित नागरे, एम.एम. सोनवणे, भालचंद्र राणे, रमेश थोरात, विजय ठाकूर, मंगला आहेर, आरती समिती प्रमुख जयमाला बंग, मंगला कुलकर्णी, योगिता उदावंत, मंगला थोरात, सोनाली शहा, संगीता केडिया, मोहिनी चव्हाण, वर्षा वैद्य, कमल वर्मा, सुनीता नागरे, मीनाताई घोडके आदी उपस्थित होते.
तसेच विवेक वैद्य, मालवीय, भन्साळी, मंडप व स्टेज सजावट श्रीमती घोडके, श्री. व सौ. वैद्य, श्री . व सौ. राणे, श्री. व सौ. बंग, अभिमन्यू सुर्यवंशी, श्री. ठाकूर, सुधा पिंपरे, प्रभाकर मोगल, मनोज प्रभाकर, रत्नमाला बारस्कर, दिलीप काळे, जयवंत शिंपी, प्रभावती जोशी, आदींसह भाविकांनी महाराजांचे स्वागत करून दर्शन घेतले. यावेळी भाविक महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.