पळसे: प्रतिनिधी
नाशिक सिन्नर महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणा विरोधात सकाळी११ वाजता विविध मागण्यांसाठी रास्तारोको करत मोदी हटाव देश बचाव, कांदा निर्यातकर रद्द करावा असा अनेक मागण्यासाठी सुमारे तासभर सरकार विरोधात आदोंलन करण्यात आले.
आदोंलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व जिल्हाध्यक्ष गजानन शेलार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपप्रदेशध्यक्ष दिनेश धात्रक,जिल्हाध्यक्ष संगीता पाटील ,जिल्हा कार्यध्यक्ष गणेश गायधनी,रतन चावला,रामकृष्ण झाडे, रमेश औटे,मधुकर सातपुते,राजाराम मुरकुटे, जयराम शिंदे आदी सहभागी झाले होते.