धरणांवर ‘आभाळमाया’

जलसाठ्यात 10 टक्के वाढ, विसर्ग सुरू

नाशिक : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दोन दिवसांत झालेल्या मुसळधारेमुळे धरणांच्या साठ्यात 10 टक्क्यांंनी वाढ झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील धरणांत 25 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. आता त्यात वाढ होऊन 35 टक्क्यांंवर पोहोचला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जिल्ह्यातील विविध धरणांतून विसर्ग करण्यात येत आहे. यंदा मॉन्सून वेळेवर दाखल झाला आहे. जिल्ह्यात मे महिन्यातही जोरदार अवकाळी पाऊस झाला होता.
दरम्यान, जिल्ह्यातील विविध धरणांतून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला हंगामातील पहिला पूर आला आहे.

गंगापूर धरण 65 टक्क्यांवर

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणातील साठा 65.38 टक्क्यांंवर पोहोचला आहे. त्यामुळे नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मंगळवारी गंगापूर धरणात 45.31 टक्के साठा होता. दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या साठ्यात 10 टक्के वाढ झाली आहे.

धरण समूहात 10 टक्क्यांंनी वाढ

दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरण समूहात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील धरण समूहात 25 टक्के साठा होता. आता वाढ होऊन 35.68 टक्क्यांंवर जलसाठा पोहोचला आहे.

 संख्या            क्षमता             आजचा उपयुक्त पाणीसाठा          टक्के

मोठे प्रकल्प          07                48,004
मध्यम प्रकल्प      17                 17,660               23,426                                      35.68
एकूण प्रकल्प        24               65,664

 

या धरणांतून सायंकाळी
6 वाजता (दि. 20) विसर्ग

 धरण                          विसर्ग
दारणा   –                      4,742 क्यूसेक
गंगापूर  –                      1,160 क्यूसेक
कादवा   –                      530 क्यूसेक
पालखेड  –                     2800 क्यूसेक
होळकर पूल  –               1,631 क्यूसेक
नांदूरमध्यमेश्वर –        9,465क्यूसेक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *