राज्यात उष्णता वाढणार

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आता प्रचंड उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कमाल तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअस पार करून चाळीशी गाठतानाचे चित्र आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यभर उष्णतेचा अलर्ट दिला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उष्ण व आर्द्र हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यभरात कमाल तापमानात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विदर्भात पुढील दोन दिवसांत पारा तापणार असून, तीन जिल्ह्यांना उन्हाचा तडाखा बसणार आहे. पुढील दोन दिवसांत राज्यातील कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी वाढणार आहे. महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे जाईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ एस. डी. सानप यांनी वर्तवला आहे.

अमरावतीत सर्वाधिक तापमान

सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली. 40.8 अंश सेल्सिअस तापमान अमरावतीत नोंदवले गेले. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तापमान हे 36 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. प्रादेशिक हवामान खात्याने विदर्भात पुढील दोन दिवस तापमानाचा हाय अलर्ट दिला आहे. अकोला, अमरावती आणि वर्ध्यात पुढील दोन दिवस पारा चाळीशी पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Heat will increase in the state

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *