वनक्षेत्रात वन्यप्राण्यांना पाण्याची व्यवस्था

राजापूर-ममदापूर क्षेत्रात पाणवठ्यांमध्ये टाकले पाणी

नगरसूल : प्रतिनिधी
येवला तालुक्यातील पूर्वभागात राजापूर-ममदापूर राखीव व संवर्धन क्षेत्रामध्ये वन विभागातर्फे कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. पाणवठ्यांमध्ये पाणी टाकून वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वनविभागाने केली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीकडे संचार कमी झाला आहे.
सध्या मार्च महिना सुरू असून, कडक ऊन आहे. त्यामुळे राखीव व संवर्धन क्षेत्रातील भागात वॉटर हॉल व कृत्रिम पाणवठे तयार केले, तर काही ठिकाणी सोलरच्या सहाय्याने पांढरे पाणी टाकले जातेे. नाशिक वन विभाग पूर्व भाग येवला वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भाऊसाहेब माळी, ममदापूर वनरक्षक गोपाल हरगावकर, वनरक्षक गोपाल राठोड, वनरक्षक पंकज नागपुरे, वनसेवक आप्पा वाघ, मनोहर दाणे, मच्छिंद्र ठाकरे, सोमनाथ ठाकरे व वनमजूर या पाणवठ्यात पिण्याचे पाणी आहे की नाही, यावेळी वेळोवेळी लक्ष देत असून, वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात पाण्याची तीव्रता व कमतरता भासू नये, यासाठी काही ठिकाणी टँकरने पाणी टाकण्यात येत आहे. तालुक्यातील पूर्व भाग डोंगराळ असून, त्यात राजापूर-ममदापूर खडकामाळ, माळरानावर हरिण, काळवीट यांचा मुक्त संचार पाहण्यास मिळतो. यावर संरक्षण क्षेत्रामध्ये प्रामुख्याने हरिण, काळवीट, मोर, तरस, लांडगे, कोल्हे, ससे अशी अनेक वन्यप्राण्यांची पाण्याची व्यवस्था झाल्याने मानवी वस्तीत या प्राण्यांचा संचार कमी झाला आहे.

राखीव व संवर्धन क्षेत्रात कृत्रिम पाणवठे असून, त्यात टँकरद्वारे पाणी टाकले जाते, तर काही ठिकाणी सौरऊर्जेवर बोअरवेल्स असून, वॉटर हॉलमध्ये पाणी टाकले जात आहे. त्यामुळे वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची पाण्याची व्यवस्था झाली आहे.
-गोपाल राठोड, वनरक्षक, राजापूर

Water arrangement for wild animals in forest areas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *