मुंबई
राज्यातील जनतेसाठी सरकारने राज्यातील दिवाळी गोड जावी म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना (ration gift) शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.