नांदूर नाक्याजवळ अपघात
बसमधील12 प्रवाशी ठार
नांदूर नाका: वार्ताहर
येथे खासगी बस आणि कंटेनर यांची धडक, झाल्यानंतर बसने पेट घेतल्यामुळे 12 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला,
या अपघातामध्ये बसला भीषण आग लागली. या अग्नितांडवात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. प्रत्यक्ष दर्शीनी दिलेल्या माहितीनुसार घटनेत 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला आहे.
यवतमाळहून मुंबईकडे निघालेल्या खासगी बसला हा अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतला. नांदूर नाक्याजवळ हा अपघात घडला. या बसमध्ये अनेक प्रवासी असल्याची माहिती मिळत असून 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे,