महाराष्ट्र

वीरांच्या मिरवणूकीला उधाण

धुळवड पारंपरिक उत्साहात साजरी
नाशिक ः प्रतिनिधी
धुळवड पारंपारिक उत्साहात साजरी करण्यात आली.धुळवड आणि वीरांच्या मिरवणूकीने उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांचा उत्साह धुळवडीला वाढला होता.
होलीच्या दुसर्‍या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते उत्तर भारतीयंामध्ये धुळवडीला रंगपंचमी साजरी करतात.
शहर आणि उपनगरांमध्ये होळीभोवती देवाचे प्रतिक म्हणून लहान मुलांना वीराची वेशभूषा करून नाचविण्यात आले.तर शहरात प्रथेप्रमाणे जुने नाशिक ते रामकुंडापर्यंत वीरांची मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूकीला प्राचीन परंपरा असल्याने दाजीबा वीर मिरवणूकीचा उत्साह शिगेला पोहचला होता.याप्रसंगी दाजिबा विरांचा विशेष मान आहे.

 

 

 

 

शहरातील मेनरोड,सराङ्ग बाजार, तीवंधा चौक,पाटील गल्लीसह गोदाघाट आदी परिसरातून ढोल वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
धुलिवंदन अर्थात धुळवडीला वीर नाचविण्यात आले.पाटील गल्ली येथून विरांच्या मिरवणूकीला दुपारी चार वाजता सुरूवात झाली.सायंकाळी विरांच्या टाकाची विधीवत पूजा करण्यात आली.टाक खोबर्‍याच्या वाटीत घेवून मिरविण्यात आले. होळीला प्रदक्षिणा मारून पुढे मिरवणूक मार्गस्थ करण्यात आली.शहरातून मिरविल्यानंतर टाकांचे रामकुंडावर स्नान घालून विधिवत पूजन करण्यात आले.

 

 

 

त्यानंतर घरी नैवेद्य दाखविण्यात आला.या दिवशी होळीच्या निखार्‍चांवर पाणी तापवून त्याने घरातील सर्वांनी अंघोळ करण्यास आगामी उन्हाळा सुसह्य होतो.उष्म्याचे विकार होत नाही अशी धारणा असल्याने लहानथोर स्नान करतात.कोरोनामुळे दोन वर्ष सण उत्सवांवर सावट होते.यंदा वीरांची मिरवणूक,धुळवडीचा उत्साह जोरदार साजरा करण्यात आला.

 

 

 

बाशिंगाच्या वीरांची जूनी परंपरा शहरात आहे.मिरवणूक बुधवार पेठ,चव्हाटा संभाजी चौक,तांबट गल्ली,मेनरोड,रविवार कारंजा आदी ठिकाणाहून गोदाघाटावर रात्री बारा वाजता येते परतीच्या मार्गावरही पारंपरिक वाद्यांच्या गजरात घरी नेली जाते.पाचव्या दिवशी रहाड खोदून पुजा केली जाते.
रहाडीत रंगपंचमी खेळली जाते.
सागर बांडे

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

16 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

24 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

30 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

35 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

41 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

55 minutes ago