धार्मिक स्थळी शालेय साहित्य मागून केले जाते भावनिक
नाशिक : प्रतिनिधी
पर्यटन किंवा धार्मिकस्थळी आलेल्या भाविक , पर्यटकांना शालेय पुस्तके , दप्तर , वही , पेन आदी साहित्य मागत भावनिक भीक मागितली जात आहे . त्यामुळे फिरण्यास येणाऱ्या नागरिकही या भावनिकतेला बळी पडत असले तरी त्यातून मनस्ताप सहन करावा लागत आहे . शैक्षणिक साहित्य खरेदी करून दिल्यानंतर ही मुले मिळालेले पुस्तके , दप्तर , वही , पेन दुकानदारांना किंवा इतरांना विकून पैसे मिळवित असल्याचे चित्र आहे .
शहर आणि राज्यातील पर्यटनस्थळी त्र्यंबकेश्वर , पांडवलेणी , वणी , सापुतारा , शिर्डी , गडकिल्ले आदी ठिकाणी पर्यटक , भाविक
आहे . मोठ्या प्रमाणावर येत असतात . कोरोना उतरणीला लागल्यामुळे पर्यटनाचा जोर वाढला वाढला गेल्या दोन वर्षांत पर्यटन किंवा देवदर्शनासाठी बाहेर पडता आले नव्हते . आता जनजीवन पूर्वपदावर येत असताना उन्हाळी सुटीमुळे अनेक नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत . देवदर्शन किंवा निसर्गरम्य ठिकाणी पूजासाहित्य किंवा त्या ठिकाणचे वैशिष्ट्ये असलेल्या वस्तू पर्यटकांना विकण्यासाठी चढाओढ दिसून येते . त्यातून अनेकदा मनस्ताप होतो . लहान मुलांमार्फत भीक मागितली जाते . अनेकजण भूतदयेने दानधर्माच्या नावाखाली पैसे दान करतात . ही भीक मागणारी मुले किंवा स्त्री – पुरुष पैसे घेऊन व्यसन करतात . गुजराण करतात .
पर्यटन , धार्मिकस्थळी – लहानमुलांकरवी पैसे मागण्याचे प्रमाण जास्त आहे . त्याचा त्रास पर्यटकांना होतो . परंतु , याबाबत चाइल्ड हेल्पलाइनला कळविण्याचे प्रमाण अत्यल्प आहे . गरीब , व्यसनी , अपंग असलेली मुले कुटुंबातील वडिलांच्या व्यसन किंवा गरिबीच्या कारणांमुळे शहरात भीक मागताना सिग्नल , बसस्थानके , दिसतात . खेळणी , बगिचे , गर्दीच्या ठिकाणांवर येणाऱ्या जाणाऱ्यांकडून पैसे , अन्न मागून किंवा त्यांच्याजवळील गजरे , फगे आदी विकत घेण्यास भाग पाडून पैसे मिळवितात . सिग्नलवर अनेकदा लहान , गरीब मुलांना मदत म्हणून नागरिक त्यांच्याकडील वस्तू विकतही घेतात . मदत करतात . शालेय साहित्य पदरात पाडल्यानंतर परस्पर कमी किमतीत किंवा दुकानदारांना विकून पैसे मिळविले जात आहेत . अशा प्रकारामुळे पर्यटकही चक्रावले आहेत .
शहरात २८ तारखेला रेस्कू ऑपरेशन राबविले होते . त्यामध्ये ३६ मुले सापडली होती . त्यापैकी २२ जणांच्या पालकांनी महिला – बालकल्याण समितीत हजेरी लावली . त्यांच्या पालकांना समज देऊन बालके ताब्यात दिली . उरलेल्या चौदा बालकांची ओळख पूर्णतः पटलेली नाही अशांना बालगृहात ठेवण्यात आले . त्यातील आठ बालकांची ओळख पटवून पालक घेऊन गेले . असे रेस्कू ऑपरेशन वारंवार राबविणार आहे . त्यामुळे जनजागृती होईल आणि कोणी जाणीवपूर्वक असे करीत असेल तर अशांना चपराक बसेल . कोविड काळ सोडला तर वर्षातून तीन ते चार मोहिमा राबविल्या जातात . त्यातील अनेक बालके शालेय प्रवाहात आणले जातात .
– अजय फडोळ
( जिल्हा महिला व बालविकास अधिकारी )
बालकल्याण समितीकडे चाइल्डलाइन किंवा इतर कोणी तक्रार केली की मुलांना बालकल्याण समितीकडे सादर केले जाते . बालकल्याण समिती बालकाची माहिती घेते . अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणि पूर्णरचनेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जातो . अनेकांना अशा बालकांची तक्रार किंवा त्यांच्याबाबतीत कोणाकडे घेऊन जावे याची माहिती नसते . अशावेळी चाइल्डलाइन हेल्पलाइन १०९८ ला फोन केल्यास तात्काळ मदत मिळू शकते .
– शोभा पवार
( सदस्या , कल्याण समिती , नाशिक )
हेही वाचा : मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर तडीपार
ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…
मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही... कुठे घडला नेमका हा प्रकार? शहापूर : प्रतिनिधी…
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…