नाशिक

आगीमुळे वन्यजीवांना धोका

निफाड: प्रतिनिधी
जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र असलेल्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात सोमवारी वणवा पेटल्याची घटना घडली. या आगीमुळे हजारो पक्ष्यांच्या अधिवास व जैवविविधता धोक्यात आली आहे.
निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणावर स्थित असलेल्या तसेच महाराष्ट्राचे भरतपूर असलेले नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य येथे दरवर्षी देश-विदेशातून हजारो पक्षी डेरेदाखल होतात. या पक्ष्यांना बघण्यासाठी देशभरातील पक्षिमत्र येतात. अभयारण्य क्षेत्रात चापडगाव येथील पक्षी निरीक्षणाच्या शेवटच्या टॉवरजवळ गोदावरी काठावर वणवा भडकला. त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

16 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

16 hours ago