नाशिक

उद्योगमंत्र्यांच्या पत्रानंतर आजचा उद्योग बंदचा निर्णय मागे

 

नाशिक : प्रतिनिधी
‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर झालेला हल्ला हा उद्योग जगतावरील हल्ला असून तो  निषेधार्थ आहे. परंतु उद्योजक , कामगारांचे नुकसान होऊ नये यासाठी उद्योजकांनी बंद मागे घ्यावा असे पत्र उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पाठविले. तसेच आरोपींना कठोर कारवाई होणारच असे आश्वासन देखील सामंत यांनी देऊन, या प्रश्नबाबत ७ किंवा ८ जुन रोजी मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईत बैठक होणार आहे. त्यामुळे   शुक्रवारी (दि.२) जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती उद्योजकांच्या सुकानु समितीचे सदस्य ज्ञानेश्वर गोपाळे यांनी दिली.
निमा येथे आयोजीत पत्रकार परिषदेत निमाचे अध्यक्ष धनंजय बेले, उपाध्यक्ष किशोर राठी वरून तलवार ,डीजे जोशी, जोशी आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ , योगेश पाटील, ज्ञानेश्वर
गोपाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
गोपाळे यांनी निर्णय जाहीर करण्यापूर्वी बेले यांनी सर्व उद्योग व कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. उद्योग मंत्र्यांचे लेखी पत्र, भाजपा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे, मंत्री गिरिश महाजन, दादा भुसे यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी फोनवर कंपनीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. परंतु उद्योग हितासाठी  चांगले कार्य सुरू असताना तुम्ही एक पाऊल मागे या अशी विनंती सर्वांनी केली. आरोपीवर कठोर कारवाईचे देखील आश्वासन दीले. त्यामुळे बेले यांनी उद्योग बंदचा निर्णय मागे घ्यावा  अशी विनंती सुकानु  समितीला केली. त्यानंतर सुकानु समिती तर्फे गोपाळे यांनी निर्णय जाहीर केला. बंदला सर्वच उद्योग संघटना, सिटू सह इतर  कामगार संघटनेनेही पाठींबा दिल्याचे राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.
सिन्नर इंडस्ट्रीज मन्यू फॅक्चर असोसिएशन तर्फे बनावट लेटर हेड वर उद्योग बंदला पाठिंबा नसल्याचे सर्वत्र व्हायरल झाले.ते कोणीतरी चुकीच्या लोकांनी केल्याचे अध्यक्ष किशोर राठी यांनी सांगितले. संस्थेचा प्रव क्ता लवकरच जाहीर करू असेही राठी म्हणाले. आम्ही कायम उद्योग विकासासोबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

17 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

17 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

18 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

18 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

18 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

18 hours ago