मद्यविक्री दुकानांमुळे वाढत्या गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये संताप
दिंडोरी : प्रतिनिधी
वणी शहरातील दामोदरनगर परिसरात दि. 30 मे रोजी दुपारी घडलेल्या चाकू हल्ल्याच्या प्रयत्नामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वादाची कुरापत काढून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी राहुल भास्कर मोरे यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने राहुल मोरे यांनी प्रसंगावधान राखून वार चुकविल्याने जीवितहानी टळली.
या घटनेनंतर ग्रामस्थ व पोलिसांनी आरोपींचा सिनेस्टाइल पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल भास्कर मोरे (वय 35, रा. कसबे वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) हे दामोदरनगर परिसरातील आपल्या दुकानाजवळ शनिवारी दुपारी उपस्थित असताना आरोपी कृष्णा संतोष चव्हाण व गुरुराज बाबुलाल चव्हाण (दोघेही रा. नवनाथनगर, पेठरोड, नाशिक) तेथे आले. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून आरोपींनी राहुल मोरे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच वाद विकोपाला गेला आणि आरोपींनी धारदार चॉपर काढून राहुल मोरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. आरोपींनी केलेला वार राहुल मोरे यांनी चपळाईने चुकविला. मात्र, या झटापटीत त्यांना दुखापत झाली.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, आरोपी अत्यंत आक्रमक पद्धतीने वागत होते आणि परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. या हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, पळून जातानाही त्यांच्या हातात धारदार शस्त्रेे होती.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत आरोपींचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, वणी पोलिस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. नागरिक आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आरोपींचा काही अंतरापर्यंत पाठलाग करण्यात आला आणि अखेर दोघांनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक किरण जगदाळे व त्यांच्या सहकार्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 136/2026 दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण जगदाळे करीत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर दामोदरनगर परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिसरात असलेल्या मद्यविक्री दुकानांमुळे अनेक वर्षांपासून कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मद्यपींकडून वारंवार होणारी शिवीगाळ, भांडणे, मारामार्या, महिलांची छेडछाड, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तसेच वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांचे जगणे असुरक्षित बनल्याची भावना व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, याच कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत संबंधित मद्यविक्री दुकाने दामोदरनगर परिसरातून स्थलांतरित करण्याचा ठराव यापूर्वी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ग्रामसभेचा ठराव झाल्यानंतरही त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे. मद्यविक्री केंद्रांभोवती निर्माण होणार्या सामाजिक समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, या परिसरात अनेकदा रस्त्यावरच मद्यपींची गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अनेक वेळा किरकोळ वादातून मोठ्या मारामार्या झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता थेट चॉपर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने परिस्थिती किती गंभीर बनली आहे, हे या घटनेवरून स्पष्ट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे दामोदरनगरसह संपूर्ण वणी शहरात चर्चेला उधाण आले असून, परिसरातील नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Attempted knife attack causes panic in Vani
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…
बाजारात गावरान कैर्यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…
कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…
ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…
सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…
इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…