नाशिक

तुळजापूरजवळ बोलेरोला अपघात; चासचे तीन तरुण ठार

तामलवाडी गावाजवळील घटना;सहा गंभीर जखमी,
सिन्नर ः प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावाजवळ सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर कटारे मिल समोर मंगळवारी (दि.21) सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास धावत्या बॅलेरो गाडीचे टायर फुटून गाडी उलटल्याने तिघांचा जागेवर चिरडून मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. निखिल रामदास सानप (23), अनिकेत बाळासाहेब भाबड (23), अथर्व शशिकांत खैरनार (22) सर्व रा. चास, ता. सिन्नर असे मृत तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे चाससह भोजापूर खोरे परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चास येथील नऊ भाविक बॅलेरो गाडीने (क्र.एम.एच 12 ई.एक्स 3211) सोमवारी (दि.20) रात्री 10 च्या दरम्यान तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते. मंगळवारी सोलापूरहुन तुळजापूरच्या दिशेने जात होते. तूळजापूर अवघे 15 मिनीटांच्या अंतरावर राहीले असतांना तामलवाडी हद्दीत असलेल्या कटारे स्पीनिंग मिलजवळ पहाटे 6.30 वाजेच्या दरम्यान धावत्या गाडीचे पाठीमागील उजवे टायर अचानक फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला खड्‌ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत जीपमधील जखमींना बाहेर काढले. यानंतर त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात निखिल रामदास सानप, अनिकेत बाळासाहेब भाबड, अथर्व शशिकांत खैरनार यांचा जागीच मृत्यू झाला. तर दीपक बबन बिडगर (23), तुषार दत्तात्रय बिडगर (21) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सोलापूर येथील स्पर्श हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर गणेश ज्ञानदेव खैरनार (35), जीवन सुदाम ढाकणे (26), शंकर बाळासाहेब भाबड (23), पंकज बाळासाहेब खैरनार (28) हे चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताचा तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या पथकाने, आयआरबीच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सोलापूरला पाठवले. या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांच्या पार्थिवांचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तर तामलवाडी पोलिसांनी पंचनामा करत अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

2 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago