मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिटे जागीच थांबल्या उल्हासनगर : रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरचा विषय झाल्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. उल्हासनगर स्थानकात पादचारी पुलाचे काम सुरू असताना ओव्हरहेड वायरवर पुलाच्या कामाची वायर पडली.मुंबईकरांसाठी महत्वाची असलेली मध्य रेल्वेची सेवा गुरुवारी पुन्हा विस्कळीत झाली. गुरुवारी दुपारी मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिटे जागीच थांबल्या. उल्हासनगर रेल्वे स्थानक येथे असणारी ओव्हरहेड वायर काही काळ बंद करण्यात आल्या. त्यामुळे रेल्वे सेवेचा खोळंबा झाला. काही काळानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली. परंतु सध्या लोकल गाड्या उशिराने धावत आहेत.मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा उशिराने सुरु आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरचा विषय झाल्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. उल्हासनगर स्थानकात पादचारी पुलाचे काम सुरू असताना ओव्हरहेड वायरवर पुलाच्या कामाची वायर पडली. त्यामुळे ठिणग्या उडाल्या. धोका लक्षात घेऊन स्टेशन मास्तरांनी तत्परतेने ओव्हर हेड वायर काही काळ बंद केली. त्यामुळे लोकल्स 15 ते 20 मिनिटे जागीच थांबल्या होत्या. काही वेळाने रेल्वे सेवा उशिराने सुरू झाली.
इंदिरानगरमध्ये ठिय्या, पोलीस निरीक्षकावर मारहाणीचा आरोप सिडको विशेष प्रतिनिधी :-इंदिरानगर पोलीस ठाण्यात सोशल मीडियावर वादग्रस्त…
माजी खासदार शेट्टी ः योग्य वेळी पाऊल उचलणे आवश्यक होते लासलगाव ः वार्ताहर सध्या कांद्याला…
इगतपुरीत शेतकरी, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन इगतपुरी ः प्रतिनिधी तालुक्यातील शेतकरी व कामगारांच्या विविध समस्या…
सोग्रस : चांदवड तालुक्यातील हरणूल व हरसूलच्या शिवारात गेल्या चार ते पाच दिवसांपासून बछड्यांसह बिबट्याचा…
सिन्नर : तालुक्यातील मोह येथे 60 फूट खोल विहिरीत पडून काळवीटाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी…
सावानाच्या वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण नाशिक : प्रतिनिधी पुस्तकांत माणसांना समृद्ध करण्याची शक्ती असते. पुस्तक वाचनातून…