नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम संथ झाली आहे . देशभरात तिला चांगलीच गती देण्याची गरज आहे . त्यामुळे केंद्राने सर्व राज्यांना जूनपासून ‘ हर घर दस्तक मोहीम २ ‘ दोन महिने राबवण्याची सूचना केली आहे . आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आवाहन केले आहे की , देशभरात संपूर्ण लसीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी मोहिमेची गती वाढवण्याची गरज आहे . राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसह झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही सूचना केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे दिली . पत्रकात नमूद केले आहे , की ‘ हर घर दस्तक ‘ योजनेचा दुसरा टप्पा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी राबवावा . येत्या जून व जुलैत सर्व जिल्हे , गाव पातळीवर सर्वत्र ही योजना अंमलात आणावी .
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…