या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य बाहेर सर्वकाही शोधतो, पण स्वतःला शोधत नाही, हीच अज्ञानाची खरी ओळख आहे.
मनुष्य कितीही शिकलेला असेल आणि नीटनेटके राहणीमानही असेल, पण वागण्यात शालीनता नसेल आणि विचारांमधेही शुद्धता नसेल तर हे एक प्रकारचे अज्ञान म्हणावे लागेल. अज्ञान म्हणजे मी कोण आहे विसरणे आहे.
ही सर्व सृष्टी देवाने निर्माण केलेली आहे. सृष्टीच्या कणाकणांत ईश्वर आहे. मनुष्य हा एक देहरूपी मानव आहे. मनुष्य नातेसंबंधात स्वतःची ओळख शोधत असतो; परंतु माणसातल्या देवाला विसरतो. एखादी व्यक्ती ईश्वराचे सतत नामस्मरण करत असेल आणि एखाद्याला खूप त्रास देत असेल, खोटे बोलत असेल. एखाद्याला टोमणे मारणे, अपमान करणे अशा प्रकारचे कृत्य करत असेल, तर त्या नामस्मरणाला काहींच अर्थ राहत नाही. मनाचा निचरा हा केला नाही आणि वागण्यात आचरणात विचारांची शुद्धता नसेल तर त्या देवत्वाचा काहींच उपयोग होत नाही. एका क्षणिक अहंकाराच्या खोट्या भ्रमात राहून अगदी किळसवाने लाजिरवाणेे कृत्य एखादी व्यक्ती दुसर्या कोण्या एका व्यक्तीबरोबर करत असते तेव्हा नकळत त्या त्रयस्थ व्यक्तीचा तळतळाट लागल्याशिवाय राहत नाही.खुर्चीचा अहंकार आणि मनाचा अहंपणा या दोन गोष्टीमुळे माणुसकी मरत चालली आहे, हे दिसते. मित्रांनो, अहंकाराने मने दूषित होऊन माणसामाणसांतले अंतर वाढत जाते. आणि प्रत्येक व्यक्ती मैत्रीमध्ये एकमेकांपासून दुरावली जाते. क्षणिक काळानंतर एका विशिष्ट वेळेनंतर ती खुर्ची आणि अहंकारही राहत नाही.
मग ह्या खोट्या अहंकाराला आपण मनात का स्थान देतो? कुठलीही गोष्ट व सुख काही काळापुरते असते आणि नियती एकदा पुन्हा त्या मनुष्याला त्याची जागा दाखवत असते.
नियतीपुढे सर्वांनाच एक ना एक दिवस झुकावे लागते. मग या मनात घाणेरड्या विचारांचा कचरा का असतो? मनुष्याने मनातला दृष्ट चक्रांचा कचरा साफ केला पाहिजे आणि विचारांमध्ये शुद्धता आणली पाहिजे. मनुष्याने वाईट विचारांचा निचरा केला पाहिजे. आत्म्याची ओळख लक्षात ठेवून तसे चांगले वर्तन आचरणात आणणे हेच आत्मज्ञान होय. आत्मज्ञान म्हणजे काही नवीन मिळवणं नाही. ते आधीपासून आपल्यात आहे. फक्त अज्ञानाचा पडदा दूर केला की, आत्मज्ञानाचा प्रकाश प्रकट होतो.आत्मज्ञान आलं की, मनुष्य बदलतो. आत्म्याला जाणणे म्हणजे हा सद्गुरूंचा मार्ग अवलंबणे होय.
(सदर लेखाचा कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळल्यास तो योगायोग समजावा.)
Drainage of the mind and purity of thoughts
इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…
सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…
स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…
यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…
आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…
मनाला सुन्न करणार्या अनेक घटना आपल्या आसपास सतत घडत असतात. एखादी गोष्ट अशी घडते कि…