नामको बॅंकेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ धात्रक यांचे निधन

नाशिक : सहकार, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, नामको बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि डोंगरे वसतिगृहाचे माजी अध्यक्ष हरिभाऊ (नाना) लक्ष्मण धात्रक यांचे वृध्दपकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाम येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सुना असा परिवार आहे. क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांचे ते वडील होत.
हरिभाऊ उर्फ नाना यांचा जन्म ११ जानेवारी १९३३ रोजी स्वातंर्त्यपूर्व काळात झाला. त्यांचे मूळ गाव दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड. व्यवसायानिमित्ताने धात्रक कुटुंब नाशिक मधील पंचवटीत स्थिरस्थावर झाले. स्वातंर्त्य चळवळीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर राहिला. सुरुवातीला पारंपारिक वखारीचा व्यवसाय करणाऱ्या हरिभाऊ धात्रक यांनी पुढे बांधकाम क्षेत्रात जम बसविला. व्यवसाय करीत असताना त्यांनी अनेक सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतले. डोंगरे विद्यार्थी वसतीगृहाचे ते अध्यक्ष होते. पुढे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या शिक्षण संस्थेच्या स्थापनेत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. या संस्थेचे देखील त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले. नाशिक मर्चंट को-ऑप. बँकेवर 32 वर्षे ते संचालक होते. बॅंकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण भागात बॅंकेचा विस्तार केला. डोंगरे विद्यार्थी वसतीगृह व क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था एकत्रीकरणात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राचे अध्यक्ष तसेच रिमांड होम या संस्थेवर पदाधिकारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. बुधवारी सायंकाळी नाशिक अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी समाजिक, राजकीय, बांधकाम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

8 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago