मुंबई : राज्यातील युवकांसाठी मोठी बातमी आहे . राज्यात लवकरच पोलीस भरतीप्रक्रिया पार पडणार आहे . गृहविभागातर्फे ७ हजार पदांसाठी पोलीस भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे . पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी ही भरतीप्रक्रिया पार पडणार आहे , अशी माहिती सूत्रांनी दिली आहे . त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे . गृहविभागातर्फे हजार पदांसाठी पोलीस भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे . आहे . हीभरतीप्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे . लवकरच यासंबंधीची जाहिरात देखील काढली जाणार आहे . त्यादृष्टीने गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे .
तसेच पहिल्या टप्प्यात ७ हजार पदांच्या भरतीप्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरतीप्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे . राज्यातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांमधील २०१ ९ च्या भरती प्रक्रियेनुसार ५२०० पदांची भरती होणार होती . ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून निवड झालेले उमेदवार सेवेत रुजू होत आहेत . राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पोलीस भरतीसंदर्भात माहिती दिली होती .
तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…
नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …
राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…
आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्यांच्या…