आस्वाद

हक्काचा दिवस

मंगल देशा, पवित्र देशा,
पावन देशा, प्रणाम घ्यावा माझा
हा महाराष्ट्र देशा.
कष्टकरी वर्ग मिळेल ते काम करून आपले आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी आपले गाव सोडून शहरी भागात येतो. घाम गाळून प्रसंगी उपाशी पोटी राहून रक्ताचे पाणी करून कष्ट करत असतो.त्यांना कृतज्ञता म्हणून 1 मे रोजी कामगार दिवस म्हणून आपण साजरा करतो. 1 मे या दिवसाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मात्र, एवढंच नाही 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय महत्त्वदेखील आहे. कारण जगभरात हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. अठराव्या शतकात झालेल्या एका कामगार चळवळीच्या गौरवासाठी आजही जगभरात साजरा करण्यात येणारा हा एक खास दिवस म्हणून ओळखला जातो. भारतात कामगार दिनानिमित्त सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते. विशेष म्हणजे जगभरात अनेक देशांमध्ये हा दिवस निरनिराळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठीच 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन हा सर्व कामगार बंधूंचा हक्काचा आणि आनंदाचा दिवस असतो.
अलका सानप

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

20 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

20 hours ago