प्रेमविवाह करणाऱ्यांना आता खाकीचे सुरक्षा कवच, नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात स्थापन केला विशेष कक्ष

प्रेमविवाह करणाऱ्यांना आता खाकीचे सुरक्षा कवच
शहर पोलीस आयुक्तालयात स्थापन केला विशेष कक्ष
नाशिक : प्रतिनिधी
प्रेमविवाहातून अनेकदा जोडप्याला मारहाण करण्याबरोबरच सैराट सारख्या घटनाही घडतात. त्यामुळे आता आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना पोलिसांचे सुरक्षा कवच लाभणार आहे. प्रेम विवाह केलेल्या दाम्पत्याच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयात विशेष कक्ष स्थापन केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंचल मुदगल यांच्यावर या विशेष कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रेम विवाह करणाऱ्यांना या विशेष कक्षाच्या माध्यमातून संरक्षणाचे कवच लाभणार आहे.


समाजामध्ये प्रेम विवाह करणाऱ्याचे प्रमाण कमी नाही. आंतरजातीय विवाहातून अनेकदा अप्रिय घटना घडतात. अनेकदा जात पंचायतीच्या निवाड्यातून प्रेम विवाह अथवा आंतरजातीय, आंतर धर्मीय विवाह केलेल्या दाम्पत्याना समाजात जगणे कठीण होऊन जाते. यातून सैराट सारख्या घटनांची देखील पुनरावृत्ती होते . या घटनांना पायबंद घालण्यासाठी आणि प्रेम विवाह केलेल्या जोडप्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी गृह विभाग आणि पोलीस खात्याची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात रिट याचिकाही दाखल झाली असता या याचिकेत असलेल्या दिशादर्शक निर्देशांचे तातडीने पालन करण्यात यावे, अशा सूचना केंद्र शासित प्रदेश, राज्य व पोलीस प्रमुखांना दिल्या होत्या. त्यानुसार प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याना गरजेनुसार पोलीस संरक्षण देखील दिले जाणार आहे. तसेच अशा जोडप्यांना त्रास देणाऱ्या घटकांवर तसेच व्यक्तींवर कायदेशीर कारवाईचा बडगा देखील उगारण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त हे या कक्षाचे अध्यक्ष असतील, तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी सदस्य, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत.
पोलीस निरीक्षक आंचल मुदगल यांच्यावर या कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पोलीस विभागाने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

11 hours ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

11 hours ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

11 hours ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

11 hours ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

12 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

12 hours ago