नाशिक

युवकाचे अपहरण करत वीस लाखांची मागणी

 

 

 

उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

 

नाशिकरोड : प्रतिनिधी

 

शहरात काही दिवसापूर्वी सावकाराच्या जाचाला कंटाळून बाप आणि दोन लेकानी आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली होती . ही घटना ताजी असतानाच शहरात पुन्हा एकदा सावकारीचा प्रताप समोर आला असून पोलिसाचा कोणताही धाक सावकारांवर नसल्याचेचित्र आहें. दरम्यान व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड केली नाही म्हणून दोघा संशयतांनी युवकाचे अपहरण करत त्यांच्याकडे तब्बल वीस लाखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात ज्ञानेश्वर पाटील व यशवंत बागुल यांच्याविरुध्द हा गुन्हा दाखल करण्यात  झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी – प्रमिला जगन्नाथ पाटील (आनंद प्रेमशिल्प अपार्टमेंट, बोधले नगर) यांचा मुलगा संदीप हा स्विगीची डिलिव्हरीचे काम करतो. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास संदीप नाशिक रोड परिसरात डिलिव्हरी करण्यासाठी दुचाकीवर गेला होता. संदीपने आईला फोन करून सांगितले की, वीस लाख रुपये जमा करून ठेव, हे लोक प्रॉपर्टी नावावर करून मागत आहेत. मला घेऊन चालले आहेत, असे सांगून संदिपने फोन बंद केला. २०२१ मध्ये संदीप हा जमीन खरेदी विक्रीचे काम करत असताना काही जणांकडून त्याने व्याजाने पैसे घेतले होते. त्याची परतफेड केली नाही म्हणून ते लोक आजपर्यंत त्रास देत आहेत. त्यांच्या जाचाला कंटाळून दीड वर्षांपूर्वी धुळ्याहून नाशिकला राहण्यास आलो. जुलै २०१९ मध्ये आमच्या सर्व कुटुंबाला पंधरा दिवस घरात डांबून ठेवले होते. २३ जुलै २०१९ रोजी धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल झाला होता. तसेच प्रमिला पाटील यांच्या कुटुंबियांनी यशवंत बागुल व त्यांच्या बारा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. देवळाली कॅम्प  परिसरात राहत असताना गेल्या जुलैत गुन्हा दाखल केला म्हणून जितेंद्र उर्फ भैय्या ठाकूरने शिवीगाळ केली होती. बोधलेनगरच्या मेट्रो मॉलमागे आम्ही राहत असलेल्या ठिकाणी ज्ञानेश्वर पाटील, यशवंत बागुल यांनी काही दिवसापूर्वी वॉचमनला पाटील कुटुंबियांचे फोटो दाखविले. हे कुटुंबीय कुठे जाते याबाबत चौकशी केली होती. ज्ञानेश्वर पाटील व यशवंत बागुल यांनी संदीपला पळवून नेत वीस लाखाची मागणी केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

7 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago