पाकिस्तानचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू असलेले इम्रान खान यांचे सर्व डावपेच निकामी ठरल्याने देशाचे माजी पंतप्रधान होण्याची वेळ त्यांच्यावर आली. शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांनी खेळी केली, तरी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने त्यांना अविश्वास ठरावाला सामोरे जावेच लागले. पाकिस्तानची संसद असलेल्या नॅशनल असेंब्लीत आपला पराभव लांबविण्यात ते यशस्वी झाले. भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानला स्वातंत्र्यानंतर कधीही राजकीय स्थिरता लाभलेली नाही. कधी लष्करी, तर कधी संसदीय राजवट पाकिस्तानी जनतेच्या नशिबी आलेली आहे. दोन्ही प्रकारच्या राजवटींत पाकिस्तानी लोकांचे मूलभूत आर्थिक प्रश्न सुटलेले नाहीत. महागाई हा तेथील लोकांचा एक मोठा प्रश्न आहे. याच प्रश्नावरुन विरोधी पक्षांनी त्यांच्या सरकारविरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. शाहबाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ), बिलावल भुत्तो यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षांनी अविश्वास ठराव दाखल केला. सत्ताधारी आघाडीतील काही छोटे पक्षही विरोधकांना मिळाल्याने इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात आले होते. त्याचवेळी त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी राजीनामा देण्याचे टाळून विरोधकांच्या हाती सत्ता जाणार नाही, यासाठी घटनेची पायमल्ली केली. पाकिस्तानच्या संसदेचे उपाध्यक्ष कासिम सूरी यांनी इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव घटनाबाह्य ठरवून फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी संसद बरखास्त करण्याची शिफारस पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी मान्य केली. त्यामुळे विरोधकांना खेळ संपल्याचे बोलले जात होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करुन इम्रान खान यांची खेळी घटनाबाह्य ठरविली. इम्रान खान यांनी आपल्या मर्जीतील माजी सरन्यायाधीश गुलजार अहमद यांची काळजीवाहू पंतप्रधानपदी नेमणूक करण्याची सूचना केली होती. त्यानुसार अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी कार्यवाही केली. कोणत्याही परिस्थितीत विरोधकांच्या हाती सत्ता जाणार नाही, हाच त्यांचा डाव सर्वोच्च न्यायालयात उधळला गेला.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…