नाशिक : प्रतिनिधी
द्वारका परिसरात असलेल्या श्री श्री राधा मदनगोपाल मंदिर (इस्कॉन) येथे अक्षय तृतियेपासून चंदनयात्रेला प्रारंभ झाला. पुढील 21 दिवस हा उत्सव चालणार आहे.
या काळात सूर्याच्या उष्णतेत वाढ होऊन वातावरणात उन्हाची तीव्रता जाणवते. उन्हाच्या तीव्रतेपासून भगवंतांना शीतलता मिळावी, या भावनेतून भक्त भगवान श्रीकृष्णाच्या विग्रहांवर चंदनाचा लेप लावतात. अक्षयतृतीयेपासून 21 दिवस चालणार्या या उत्सवात रोज भगवान श्रीकृष्णाचा शृंगार करताना पुजारी विग्रहांवर चंदनाचे लेपण करतात. त्यासाठी सर्व भक्त रोज सकाळी चंदन उगाळून ते भगवंतांच्या सेवेत अर्पण करणार आहेत.
या सेवेसाठी सर्व वयोगटातील भक्त उत्साहाने सहभागी होतात. हा उत्सव वृंदावन व जगन्नाथपुरी येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. सोबतच जगभरातील सर्व इस्कॉन मंदिरांत केला जातो. नाशिककरांनी उत्सवात सहभागी होऊन विशेष दर्शनासाठी मंदिराला भेट द्यावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…