महाराष्ट्र

दुर्गंधीयुक्त वातावरणात एसटी कर्मचारी करताहेत काम

विभागीय कार्यालयातील स्थिती; नाकाला रुमाल लावून जेवणाची वेळ
नाशिक ः प्रतिनिधी

एन.डी पटेल रोड येथील एस.टीच्या विभागीय कार्यालयात प्रवेश करणार असेल तर नाकाला रुमाल लावणे गरजेचे आहे. कारण या कार्यालयात प्रवेश करता क्षणी जवळच असलेल्या स्वच्छता गृहातून येणार्‍या दुर्गंधीमुळे मळमळायला होते.अभ्यागत कसे तरी आपले काम उरकून निघून जातात. परंतु आठ तास अशा दुर्गंधीयुक्त वातावरणात काम करणे किती अवघडल्यागत होतेय याचा अनुभव सद्या येथील कर्मचारी घेत आहेत.
एस.टीच्या स्वच्छतागृहांची स्वच्छता गेल्या काही महिन्यांपासून झालेली नाही. न्यायालयाच्या आदेशानंतर एस.टी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. कर्मचारी कामावर परतल्याने सर्व कामकाज पूर्वपदावर येत आहे.कार्यालयात महिला पुरूष कर्मचारी स्वच्छतागृहाचा वापर करतात.परंतु अत्यंत दुर्गधी आणि अस्वच्छता असल्याने स्वच्छतागृहांचा वापर टाळावा लागत असल्याने महिला कर्मचार्‍यांची कुचंबणा होत आहे. आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे.कार्यालयात जेवणाच्या वेळी नाकावर रुमाल लावून जेवण करावे लागत असल्याचे अनेक कर्मचार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. वारंवार वरिष्ठांकडे निवेदन,तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत विभाग नियंत्रकांना विचारले असता त्यंानी बडतर्ङ्ग केलेले कर्मचारी असल्याने टप्याटप्याने कामावर येत असल्याचे सांगितले. शंभर टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले आहे. स्वच्छता कर्मचारीही हजर होत आहे. लवकरच स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

गेल्या पाच-सहा महिन्यांपासून एस.टी कर्मचार्‍यांचा विलिनीकरणाच्या मुद्यासाठी संप सुरू होता. अनेक वादविवादानंतर न्यायालयाने कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्यातील कर्मचारी कर्तव्यावर हजर होत आहेत.एस.टीचे कामकाज,ङ्गेर्‍या पूर्वपदावर येत असल्याने एन.डी पटेल रोडवरील कार्यालय परिसर कर्मचार्‍यांनी गजबजून गेला आहे. मात्र कार्यालयात पाऊल ठेवताक्षणी दुर्गधीने नाकास रुमाल लावून आत प्रवेश करावा लागत असल्याचे चित्र आहे.याबाबत विचारणा केली असता अनेकदा तक्रार,निवेदन देवूनही स्वच्छता होत नसल्याचे सांगण्यात आले.
एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जाते आहे. केवळ एन.डी.पटेल रोड येथील कार्यालयच नाही तर अनेक खासगी किंवा सरकारी कार्यालयांमध्येही हीच परिस्थिती दिसून येत आहे. कर्मचार्‍यांना काम करतांना स्वच्छ आणि आरोग्याच्या दृष्टीने पूरक असे वातावरणात काम चांगले होते.त्रासदायक आणि अपुर्‍या स्वच्छतेमुळे कामकाजावरही परिणाम होत असल्याचे अनेक कर्मचार्‍यांनी सांगितले.

कर्मचारी कामावर टप्याटप्याने हजर होत आहे.लवकरच स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात येईल.
मुकुंद कुंवर
विभाग नियंत्रक

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

18 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

37 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

43 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

52 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago