नाशिक

मनमाड जंक्शनच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

रेल्वेच्या ब्रिजवर चढला तरुण; आतापर्यंत ही चौथी घटना

मनमाड : प्रतिनिधी
मनमाड जंक्शन स्थानक असून, रोज काहीना काही घटना घडत असतात. रेल्वेच्या ब्रिजवर एक तरुण चढला. तो तरुण कोण आहे, का चढला, याबाबत काहीच माहिती नाही. रविवारी सकाळी सव्वाआठ ते साडेआठदरम्यान मोठी गर्दी असते. याचवेळी तो ब्रिजवर चढला. त्यामुळे मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकाचा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनमाड जंक्शन स्थानकावरील ही चौथी घटना आहे.
मनमाड जंक्शन स्थानकावर दिवसभरात हजारो शेकडो रेल्वे गाड्यांची ये-जा होते. हजारो प्रवासी मनमाड शहरातून येतात. यातून अनेकदा मनोरुग्ण किंवा गुन्हेगारी स्वरूपातील प्रवासीही असतात. काही महिन्यांपूर्वी मनोरुग्ण रेल्वे गाडीच्या छतावर उभे राहून हायव्होल्टेज वायरला पकडून घेतले. याआधी एका प्रवाशाने सहप्रवाशांवर अ‍ॅसिड हल्ला केला होता. अशा एकना अनेक घटना मनमाड शहरातील रेल्वेस्थानकावर घडलेल्या आहेत. काल रविवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान गोदावरी एक्स्प्रेसच्या वेळेत एक तरुण रेल्वे ओव्हरब्रिजवर चढला. रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी जाऊन बसला. हा सर्व प्रकार प्रवाशांनी मोबाईल कॅमेर्‍यात कैद केला. तरुण बराच वेळ तेथे बसला. यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांनी तेथे धाव घेतली. तरुणाला काढण्यासाठी शिडी लावली. मात्र, आपल्याकडे लोक येत असल्याचे बघून तो तरुण ज्या मार्गे वर चढला होता, त्याच मार्गाने पुन्हा पळून गेला. मुळात हा प्रकार घडला हे चुकीचे आहे. या सर्व प्रकारामुळे मनमाड रेल्वेस्थानकाची सुरक्षितताही नेमकी कोणाच्या भरोशावर आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Gavkari Admin

Recent Posts

कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले पण खाते बदलले, आता हे खाते

मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…

8 hours ago

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…

17 hours ago

मालेगाव बॉम्बस्फोट खटला: सर्व आरोपी निर्दोष

नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…

20 hours ago

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी,

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…

1 day ago

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

2 days ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

2 days ago