देवीदास पिंगळेंचा आरोप; पणनमंत्र्यांचे तीन आठवड्यांत चौकशी अहवाल देण्याचे आदेश
पंचवटी : वार्ताहर
मागील आर्थिक वर्ष 2024 -25 मध्ये एप्रिल महिन्यात दोन कोटी तेवीस लाख रुपये होते. मात्र, सत्तांतर होताच आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एप्रिल महिन्यात एक कोटी नव्वद लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत गत वर्षी जवळपास 40 लाख रुपयांनी उत्पन्न घटले आहे. नाशिक बाजार समितीत सध्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्यानेच उत्पन्नात घट झाली असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार तथा माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी केला आहे. याबाबत पिंगळे यांनी राज्याचे पणन व राज्यशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांना पत्रव्यवहार केला होता, त्या अनुषंगाने तीन दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मंत्री रावल यांनी आदेशित केले आहे. आता या अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात जिल्हाभरातून हजारो शेतकरी भाजीपाला व फळभाज्या विक्रीसाठी घेऊन येत असतात. तसेच, पेठरोडवरील शरदचंद्रजी मार्केट यार्डामध्ये कांदा, बटाटा, लसूण डाळिंब, इतर फळे व अन्नधान्याची मोठी उलाढाल
होत असते.
बाजार समितीतील सभापती व संचालक यांनी काही कर्मचार्यांच्या मदतीने बाजार समितीत जमा होणारे उत्पन्न हे रोख स्वरुपात वसुल केले आहे. संबधीतांना कोणतीही पावती न देता सदर वसुल परस्पर सभापती व संचालक यांच्यात वाटुन घेतला जात आहे. तसेच बाजार समितीत असलेले आरक्षित भूखंड ज्याचा वापर शेतकरी व व्यापारी यांच्या वाहनांच्या पार्किंग साठी केला जातो. सदर भुखंड हे बाजार समिती सभापती व संचालक कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या जवळच्या व पैसे देणा-या बाहेरच्या लोकांना 11 वर्षाच्या करारावर देत आहे. असे झाले तर शेतक-यांचे व व्यापा-याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. पुढील काळात बाजार समितीचे भवितव्य अंधारमय आहे.
– देविदास पिंगळे, माजी सभापतीअवकाळी पावसामुळे उत्पन्नात घट
बाजार समितीला शेतकर्यांच्या येणार्या मालाच्या दराच्या टक्केवारीने बाजार
फीमधून उत्पन्न मिळत असते. मात्र, मागील काळात पाऊस पडल्यामुळे पिकांचे
नुकसान झाल्याने शेतमालाची आवक घटली. त्यामुळे शेतमालाला बाजारभाव
कमी झाला. त्याचा परिणाम बाजार समितीच्या फी वसुलीतदेखील झाल्याने
बाजार समितीच्या उत्पन्नात घट झाली आहे.
– कल्पना चुंभळे, सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती
नाशिक: प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साधू महंत यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळ येथे आगमन नाशिक : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…
मनमाड : आमिन शेख मनमाड जे जंक्शन स्थानक असुन या ठिकाणी रोज काहींना काही घटना…
फॅशन वीक म्हणजे फक्त डिझायनर कपडे, कॅमेर्यांचे फ्लॅश आणि रॅम्पवॉक एवढ्यावरच मर्यादित नसते, तर ती…
1. आरामदायक फुटवेअर निवडा उन्हाळ्यात पायांना घाम येणे आणि दुर्गंधीचा त्रास होऊ शकतो. म्हणून अशा…
अहिल्यादेवी होळकर म्हणजे तुम्हा-आम्हा सर्वांच्या मनात असणारी ती प्रतिमा की, ज्यात सात्त्विकता, सुशीलता, शीतलता, पवित्रता,…