प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी
नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील अकृषी विद्यापीठय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीच्या संदर्भात 2 फेब्रुवारीपासून होऊ घातलेल्या विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. तसेच 14 फेब्रुवारी रोजी निदर्शने, 15 फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून कार्यालयीन काम करणे, 16 फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप, तर 20 फेब्रुवारी रोजी सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयाचे बेमुदत बंद अशी आंदोलनाची रूपरेषा असल्याचे महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे महासचिव रावसाहेब त्रिभूवन यांनी दिली . यावेळी दिलीप बोंदर, रमेश पवार, श्री.खैरनार, डॉ.हेमंत भावसार, श्री. धोंडोपंत गवळी आदी उपस्थित होते.
यापुर्वी 18 डिसेंबर 2021 रोजी शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी मागण्यासंदर्भात 11 दिवस काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर तात्कालिन उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी कर्मचार्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र केवळ चर्चा व आश्वासनाशिवाय काहीच होऊ शकले नसल्याने शिक्षकेत्तर कर्मचार्यांमध्ये असंतोष असल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…