उघडे चेंबर तरीही जिवावर उदार! सेल्फीसाठी जीव धोक्यात

नाशिक : अश्‍विनी पांडे
शहरासह जिल्ह्यात काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे गोदावरी नदी खळखळून वाहत आहे. गोदावरीचा पूर ओसरला असला तरी खळखळून वाहणारी गोदावरी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे. मात्र गोदाघाटावर असलेले खड्डे थेट नदीपात्राशी जोडलेले असल्याने नजरचुकीने जर कोणी खड्ड्यात पडले तर मोठा अपघात होऊ शकतो.
गोदाघाटावर असलेले अनेक चेंबर फुटले आहेत. हे चेंबर थेट नदीपात्राशी जोडलेले असल्याने फुटलेले चेंबर मृत्यूला आमंत्रण देत आहेत. गोदाघाटावर कायमच पर्यटक तेथील व्यवसायिक आणि शहरातील नागरिकांची गर्दी होत असते. गोदावरीचा पुर पाहण्यासाठी आलेले नागरिक सेल्फी काढण्यात मग्न असतात. त्यावेळी त्यांचे उघड्या चेंबरकडे दुर्लक्ष होते. तसेच अंधार पडल्यावरही हे चेंबर दिसत नाहीत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
गोदाघाटावरील अनेक चेंबर पाणी जाण्यासाठी उघडे ठेवण्यात आले आहेत. तर काही चेंबर्स फुटलेले असल्याने ते धोकादायक ठरत आहेत. मात्र या फुटलेल्या चेंबर्सकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा सवाल नागरिक विचारत आहेत. तर काही ठिकाणी नागरिकांनीच दुर्घटना होऊ नये म्हणून फुटलेल्या चेंबरवर बॅरिकेट्स टाकले आहेत. रामकुंडावर शहरातलेच नाही तर देशभरातले भाविक येत असतात. अशा वेळी उघड्या चेंबरकडे मनपा प्रशासन दुर्घटना झाल्यानंतर लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळी पर्यटन जीवावर बेल्याच्या अनेक घटना घडत आहे.त्यात गोदावरी घाटावरही अद्याप कोणतीही दुर्घटना झाली नसली तरी गोदा घाटावरचे खड्डे , उघडे चेंबर्स दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतात..त्यासाठी उघडे चेंबर लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिक, गोदाघाटावरील व्यवसायिक करत आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

3 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

3 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

3 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

3 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

4 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

4 hours ago