शुभांगी महाजन
जून महिना उजाडला. नवीन शैक्षणिक वर्षात शाळेची लगबग सुरू झाली. परंतु, मधील काळात झालेल्या बदलानुसार विद्यार्थ्यांसाठी सर्व काही नवे आहे. वर्ग नवा..अभ्यास नवा. शिक्षक नवे. पुन्हा शिक्षणपद्धती ऑफलाइन.म्हणजेच विद्यार्थ्यांना मागे सुटलेल्या मार्गांवर पुन्हा चालायचे आहे. पुन्हा नवीन वाटा शोधायच्या. पुन्हा नवीन वेगाने ठरलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना प्रयत्नशील व्हायचे आहे. मात्र, याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला असेलच असे नाही. कारण त्यांची मानसिकता बौद्धिक क्षमता, बौद्धिक पातळी ही समान नसेल म्हणून त्याच गतीने ते मार्गस्थ होतील. यामध्ये विद्यार्थ्यांना मात्र त्याची जाणीव करून देणेही तितकेच गरजेचे…
पैठणी : महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव
गेल्या वर्षात झालेले शैक्षणिक नुकसान हे न भरून निघणारे असले तरी सकारात्मक विचार समोर ठेवून पुन्हा नवीन उभारी ही निर्माण करावीच लागेल. त्यासाठी नवी जाणीव…नवे स्वप्न.. मरगळलेल्या मनात नवे चैतन्य फुलवून.. भरकटलेल्या वाटेवर योग्य दिशा दाखवण्याचे काम शिक्षक, पालक यांना जबाबदारीने पार पाडायचे आहे….काही अपेक्षा विद्यार्थ्यांकडून पालकांना असतील पण त्यांना थोडा वेळ द्या थोडी संधी द्या. त्यांची बाजू समजून मग त्या अपेक्षा हळुवारपणे पूर्ण करा म्हणून पालकांनो जरा धीर धरा आणि मुलांची बाजू पडताळा त्यासाठी प्रयत्नशील व आशावादी राहणे हे महत्त्वाचे….क्युकी सब्र का फल मीठा होता है…कड़वा नहीं…..
हे ही वाचा :
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…