आरोग्य

पावसाळ्यात घ्यायची काळजी

सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा वाढतो, पचनशक्ती कमी होते आणि रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. आयुर्वेदात पावसाळ्याला विकृतीचा काळ मानला जातो. त्यामुळे या काळात आपली दिनचर्या आणि आहार-विहार योग्य पद्धतीने ठेवणं आवश्यक आहे.

आयुर्वेदानुसार पावसाळ्यातील धोके ः
वातदोषाचा प्रकोप – सांधेदुखी, अंगदुखी, बद्धकोष्ठता, गॅसेस यांसारख्या तक्रारी वाढतात.
पचनशक्ती कमकुवत होते. अपचन, आम तयार होतो (शरीरात टॉक्सिन्स जमा होतात).
जंतुसंसर्गाचा धोका – पाण्यातून आणि अन्नातून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते.
सामान्य माणसाने घ्यायची काळजी :
आहार : उकडून घेतलेले कोमट पाणी प्या.
भात, कढी, मूगडाळ यांसारखा हलका आणि पचण्यास सोपा आहार घ्या.
तुपाचे प्रमाण थोडे वाढवा, हे पचन सुधारते.
दही टाळा, त्याऐवजी ताक घ्या पण मध्यम प्रमाणात आणि कोमट स्वरूपात.
तळलेले, थंड, साखरयुक्त आणि जड अन्न टाळा.
जीवनशैली :
पाय सुकवणे महत्त्वाचे आहे. भिजल्यास लगेच कपडे बदला.
अधूनमधून सुंठ, हळद, मिरी यांचे काढे घ्या. रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
वाफ घेणे – सर्दी-खोकल्यापासून बचाव.
योग आणि प्राणायाम करा. वात नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
नित्य अभ्यंग (तेल लावणे) विशेषतः नारळाचे किंवा तिळाचे तेल.
आयुर्वेदिक उपाय ः
त्रिफळा चूर्ण रात्री घ्या. आम आणि टॉक्सिन्स कमी करतो.
सिंधव लवण (सेंधव मीठ) आणि लिंबू टाकून गरम पाणी प्या. पचन सुधारते.
गुळवेल, तुलसी, सुंठ यांचे काढे रोज सकाळी किंवा रात्री एक वेळ.
पावसाळा आनंदाचा ऋतू असला तरी त्यामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्रासदायक ठरतो. त्यामुळे
आयुर्वेदाच्या साध्या पण प्रभावी सल्ल्यांचे पालन करून आपण आरोग्य टिकवू शकतो.

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

7 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

7 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

7 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

7 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

8 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

8 hours ago