आरोग्य

पावसाळ्यात होणारे पोटाचे आजार

अन्नविषबाधा ः
दूषित अन्न खाल्ल्यामुळे उलटी, जुलाब, पोटदुखी आदी त्रास होतो.
जुलाब व डायरिया ः
पाण्यातील जिवाणूंमुळे जुलाब होतो. शरीरातील पाणी आणि क्षार कमी होतात.
टायफॉइड सॅल्मोनेला नावाच्या जिवाणूमुळे होणारा आजार. दूषित अन्नपाण्यामुळे होतो.
हेल्मिन्थिक इंफेक्शन पावसाळ्यात जमिनीतून व अन्नातून कृमी शरीरात प्रवेश करतात. हिपॅटायटिस आणि ए यकृताला बाधा करणारे हे आजार दूषित पाणी आणि अन्नामुळे होतात.
लक्षणे ओळखण्यासाठी महत्त्वाचे संकेत
सतत पोटात मुरडा येणे किंवा दुखणे, उलटी होणे किंवा मळमळ, वारंवार जुलाब होणे, ताप येणे (विशेषतः टायफॉइड व हिपॅटायटिसमध्ये), थकवा, अशक्तपणा, भूक न लागणे, पिवळसर त्वचा व डोळे (हिपॅटायटिसचे लक्षण).
उपाय व प्रतिबंधात्मक काळजी
पाणी उकळून किंवा फिल्टर करूनच प्या. पावसात पाण्यात जीवाणूंची संख्या वाढते, त्यामुळे नेहमी स्वच्छ पाणीच वापरावे. रस्त्यावरील व उघड्यावरचे अन्न टाळा. भजी, समोसे, पाणीपुरी यांसारखे अन्नपदार्थ हवामानामुळे दूषित होण्याची शक्यता असते.
हात धुण्याची सवय लावा. जेवणाआधी व टॉयलेटनंतर साबणाने हात धुवा.
ताजं, गरम अन्न खा. उरलेले अन्न पुन्हा गरम करून वापरणे टाळा. भिजलेले कपडे वेळेत बदला. ओले कपडे व शरीर आर्द्र ठेवणे यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.
इम्युनिटी वाढवा. फळं, भाज्या, पाणी, ताजं अन्न व योग्य झोप घेतल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.
लहान मुलं व वृद्ध यांची विशेष काळजी घ्या. त्यांची रोगप्रतिकारकशक्ती तुलनेने कमी असते.
कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?
तीन दिवसांपेक्षा अधिक काळ ताप किंवा जुलाब असल्यास, उलट्यांमुळे पाणी कमी होऊन शरीरात अशक्तपणा जाणवू लागल्यास, पिवळसर त्वचा व डोळे दिसू लागल्यास, वारंवार पोटदुखी होत असल्यास.
पावसाळ्यात सण-समारंभ, प्रवास व खाण्याची मजा यांची आपल्याला जाणीव असते. पण त्याहीपेक्षा आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. स्वच्छता, अन्नपाण्याची काळजी आणि वेळेवर उपचार हेच खरे संरक्षणाचे उपाय!

Editorial Team

Recent Posts

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

4 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

17 minutes ago

नॉन क्रिमीलेअर मर्यादा पंधरा लाख

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…

53 minutes ago

मोटेगावकरच्या मुलासह विद्यार्थी, पालक रडारवर

नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…

1 hour ago

काटकसर-पर्व

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…

23 hours ago

माय मराठीसह बोलीभाषांचा जागर; आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा

माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…

23 hours ago