नाशिक

महानुभाव संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

 

संत महंतांची विविध लॉन्समध्ये निवास व्यवस्था

नाशिक : प्रतिनिधी

शहरात होऊ घातलेल्या अखिल  भारतीय महानुभाव संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात  आली असून,भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व  महानुभाव संमेलन नाशिक येथे दिनांक 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान डोंगरे वसतिगृह मैदान येथे होणार आहे.  या संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून,  भव्य मंडप उभारण्यात आला आहे.  संमेलनाच्या तयारीसाठी  विविध समित्यांचे कामकाज युद्ध पातळीवर सुरू आहे. या संमेलनासाठी येणार्‍या संत महंत, महिला तपस्विनी, साधू नामधारक वासनिक, भिक्षुक तसेच साहित्यिक व परराज्यातील महंत यांची व्यवस्था शहरातील चोपडा लॉन्स, राका गार्डन, श्रद्धा लॉन्स, पंचकृष्ण लॉन्स, पंचकृष्ण लॉन्स, लक्ष्मी विजय लॉन्स, शासकीय गेस्ट हाऊस, लक्ष्मी लॉन्स, सुदर्शन लॉन्स येथे करण्यात आली आहे. निवास व्यवस्थेची जबाबदारी विश्वास नागरे, अमोल पाटील, राजेंद्र जायभावे, साहेबराव आव्हाड, किरण मते यांच्यावर सोपविण्यात आली आहे.त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी, गादी सेट, मोबाईल टॉयलेट आदींची व्यवस्था संमेलनस्थळी  करण्यात येत आहे.  संमेलनासाठी येणार्‍या संत महंत आणि भाविकांसाठी भोजन व्यवस्थेसाठी  स्वतंत्रपणे मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. संमेलनात कोणतीही कसर राहू नये यासाठी आयोजकांकडून पुरेशी काळजी घेण्यात येत आहे. अखिल भारतीय महानुभाव संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन  संमेलनाचे  मार्गदर्शक   प. म. सुकेणेकर बाबा , प. म. चिरडे बाबा, प.म .  कृष्णराज बाबा मराठे आयोजक व स्वागतोत्सुक –   आमदार बाळासाहेब सानप,  दिनकर पाटील,  दत्ता गायकवाड,  सचिव प्रकाश  घुगे ,  खजिनदार प्रकाश  ननावरे , प्रभाकर  भोजने,  अरुण महानुभव ,  विश्वास  का. नागरे, तसेच   स्वागत समिती-   लक्ष्मण जायभावे,   भास्कर  गावित,उदय सांगळे,  सिताराम पाटील आंधळे, अरुण  भोजने,  राजेंद्र जायभावे.  संजय  भोजने, भास्कर सोनवणे,  सागर जैन, नंदू  हांडे,  किरण मते,  मुकुंद बाविस्कर,  सुरेश  डोळसे,  अनिल जाधव,  साहेब आव्हाड, रवी पेखळे,  छबु नागरे,  अमोल पाटील, शांताराम खांदवे, श्याम  कातोरे,  प्रदीप वैद्य तसेच सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्य कार्यकर्ते आणि जिल्हा निवासी संत, महंत, जिल्हा निवासी तपस्विनी, यासह सर्व  शिक्षुक, पुजारी, वासनिक, साहित्यिक, सर्व भक्त पंथातील सर्व मंडळे संस्था व पदाधिकारी, भाविक आदींनी केले आहे.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

2 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago