नाशिक

संत निवृत्तिनाथ यात्रोत्सव पौष वारीसाठी तयारीस वेग

त्र्यंबकेश्‍वर : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सव पौष वारी  दि. 18 जानेवारी रोजी संपन्न होत आहे. याबाबत शासनस्तरावर बैठका होत आहेत. संत निवृत्तिनाथ समाधी मंदिर संस्थान विश्वस्त मंडळाची नियोजन बैठक संस्थानच्या कार्यालयात संपन्न झाली. मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे, मात्र  वारकर्‍यांची व परंपरागत मानकर्‍यांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दखल संस्थानाने घेतली असून, त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
पौषवारी अगोदर मंदिर गाभार्‍यास नवीन काळा पाषाण बसविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. मंदिर
जीर्णोद्धार विकास आराखड्याच्या दृष्टीने  नियोजित असलेले गाभार्‍यातील बाकी असलेले हे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण होत आहे.
मंदिरासमोर तात्पुरत्या स्वरूपाचा सभामंडप व दर्शनबारी उभारण्यात येत असून, वारीस आलेल्या भाविकांना त्याचा वापर करता येईल. मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात येत आहे.सपाटीकरण होत आहे. मानकर्‍यांच्या येणार्‍या दिंडीसाठी स्वतंत्र सोयीसुविधा युक्त मंडप देऊन राहुट्या उभारल्या जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने करण्यात येत आहे. दर्शनबारीसाठी संस्थानकडून सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. तर मंदिर परिसराच्या बाहेर बाजूस प्रशासनाकडून सीसीटीव्ही नियोजन करण्यात आले आहे. वारकर्‍यांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने त्र्यंबकेश्वर महावितरण अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयाने रूपरेषा आखली आहे.
मंदिर दर्शनासाठी येणार्‍या वारकरी भाविकांची व मानकर्‍यांची दिंड्यांतील भाविकांची स्वच्छतागृह व्यवस्थेसाठी मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव, संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव ऍड. सोमनाथ घोटेकर, विश्वस्त नारायण मुठाळ, माधवदास राठी, श्रीपाद कुलकर्णी, नवनाथ गांगुर्डे, राहुल साळुंके, जयंत गोसावी, योगेश गोसावी, ह.भ.प. कांचनताई जगताप, भानुदास गोसावी, उपसमितीचे सदस्य निवृत्ती गंगापुत्र, बाळासाहेब पाचोरकर, कैलास अडसरे, किरण चौधरी, राजेश घुले उपस्थित होते.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

18 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

26 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

32 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

37 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

43 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

58 minutes ago