नाशिक

वर्दळीच्या रस्त्यातून धोकादायक वाहतूक

प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक : प्रतिनिधी शहरात स्मार्ट सिटीच्या कामांसाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे एकीकडे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनलेला असताना व शहरातील रस्त्यांवरून वाहने चालविणे जिकिरीचे झाले असतानाच , भर वर्दळीतून लोखंडी सळया , बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलची धोकादायक वाहतूक केली जात असल्याने यातून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे . मालवाहू टेम्पोतून लोखंडी सळया , लोखंडी पत्रे , बांधकामासाठी लागणारे स्टील आदींची वाहतूक केली जाते . हे साहित्य टेम्पो अथवा छोटा हत्ती , पिकअपमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जाते . विशेष म्हणजे या लोखंडी सळया टेम्पोच्या बाहेर लोंबकळत असतात . अशा प्रकारचे साहित्य वाहतूक करावयाचे असल्यास त्यावर लाल कापड अथवा ते बंदिस्त वाहनातून नेणे बंधनकारक असताना टेम्पोचालक सर्रासपणे भरवस्तीतून लोखंडी सळया घेऊन जाताना त्यावर लाल कापड लावण्याऐवजी बारदान , कोणत्याही रंगाचे कापड लावतात . या वाहनाच्या मागे असलेल्या दुचाकीस्वार अथवा इतर वाहनधारक धडकल्यास यातून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

11 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago