नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळ परिसरातील सीतासरोवरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताच्या तोंडातून फेस आल्याचे आढळल्यानेे हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांना मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाच्या आसपास ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांनी याबाबत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले. ही घटना घातपात आहे की अपघात, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाणे तपास करत आहे.
प्राचीन सीतासरोवराला नशेबाजांचे ग्रहण
म्हसरूळ परिसरातील या अतिप्राचीन सीतासरोवरास अनन्यसाधारण असे पौराणिक महत्त्व आहे. मात्र, या वास्तूला मद्यपी व नशेबाजांचे ग्रहण लागल्याचे दिसते. सीतासरोवर येथील सभामंडपाचा आडोसा घेत अनेक मद्यपी व नशेबाज सर्रास पावित्र्यहनन करताना दिसत आहेत. पूर्वी येणारे-जाणारे वाटसरू सीतासरोवरावर टवाळखोरांना टोकत असत. मात्र, आता सभामंडपामुळे असे टवाळखोर दिसत नाहीत.
पोलिसांनी गस्त वाढवावी
या सरोवरावर महादेवाची पिंडी, मारुतीची पुरातन मूर्ती आहे. काही भक्त-भाविक याठिकाणी नित्य पूजेसाठी येतात. मात्र, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात विजेचे खांब, तसेच पथदीप वाढवून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रात्री गस्त वाढविण्याची मागणीदेखील केली आहे.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…