नाशिक

बाभूळगावच्या एसएनडी पॉलिटेक्निकला एनबीएचे मानांकन

राज्यस्तरावर नवीन ओळख; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

येवला : प्रतिनिधी
तंत्रशिक्षण राष्ट्रीय मान्यता मंडळाने (एनबीए) मूल्यांकन करत गुणवत्तेच्या आधारे येवला तालुक्यातील बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या एसएनडी पॉलिटेक्निकला एनबीएचे मानांकन दिले आहे. यामुळे एसएनडी पॉलिटेक्निकच्या लौकिकात भर पडली आहे.
देशभरात तंत्रशिक्षण मंडळाच्या अंतर्गत सुरू असलेल्या विविध पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी विविध निकषांप्रमाणे मूल्यांकन करून मानांकन दिले जाते. या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये एसएनडी पॉलिटेक्निकने सहभाग घेऊन आपल्या गुणवत्तेच्या आधारावर मानांकनप्राप्त करून घेतले. यामुळे राज्यस्तरावर एसएनडी पॉलिटेक्निकची नवीन ओळख निर्माण झाली. पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायाच्या निर्माण होत असलेल्या संधी, उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थिसंख्या, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, निकालातील प्रगती, अत्याधुनिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पॉलिटेक्निकमध्ये होत असलेले विविध उपक्रम त्यामुळे प्रवेशासाठी असलेली विद्यार्थ्यांची पसंती व ग्रामीण भागातही पूर्णक्षमतेने होत असलेले प्रवेश, अशा विविध बाबींची एनबीएच्या प्रतिनिधींकडून प्रत्यक्ष गुणवत्ता तपासणी करण्यात आली. तंत्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या एनबीएच्या सर्व निकषांमध्ये एसएनडी पॉलिटेक्निकचे सर्व विभाग पात्र ठरले त्यावरूनच तंत्रशिक्षण राष्ट्रीय मान्यता मंडळाकडून हे मानांकन बहाल करण्यात आले. पॉलिटेक्निकमधील कॉम्पुटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागांना एनबीएचे मानांकन प्राप्त झाले. या यशाबद्दल शिक्षक आमदार किशोर दराडे, संस्थेचे कार्यकारी संचालक रुपेश दराडे यांनी प्राचार्य उत्तम जाधव यांचा सत्कार करून सर्व विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Gavkari Admin

Recent Posts

कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले पण खाते बदलले, आता हे खाते

मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…

7 hours ago

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…

15 hours ago

मालेगाव बॉम्बस्फोट खटला: सर्व आरोपी निर्दोष

नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…

19 hours ago

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी,

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…

1 day ago

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

2 days ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

2 days ago