परतीच्या पावसाचा तडाखा, वाघाडीच्या पुराने व्यावसायिकांचे हाल

नाशिक ः प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाऊस होत असताना, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर गंगापूर धरणातून 698 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. बुधवारीदेखील शहरात झालेल्या जोरदार पावसानंतर वाघाडी नाल्यातून अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे बुधवारच्या बाजारात अचानक पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे चांगलेच हाल झाले होते. तर गुरुवारी (दि. 18) दुपारी शहरात दुपारी तीन वाजेनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
हवामान विभागाकडून गेल्या पाच दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला होता, त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत आहे. मात्र, गुरुवारी सलग दोन तास झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. ठिकठिकाणी पाणी साचले होते. दोन तासांत 1 मिमी पावासाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. परिणामी, जिल्ह्यातील अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील धरणसाठ्यांत वाढ होत असल्याने 14 धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्र परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने गंगापूर धरणाचा पाणीसाठा 98.56 टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी, मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून 698 क्यूसेकने विसर्ग कण्यात येत आहे. गोदाकाठच्या नागरिकांना, व्यावसायिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, गोदावरीला पाणी वाढल्यामुळे वाहनचालकांनी वाहन देण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. गोदावरी तीरावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांची मोठी अडचण झाल्याचे चित्र होते.
शहरातील सातपूर, नवीन नाशिक, महात्मानगर परिसरात पावसाने चांगलेच झोडपून काढले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली. एबीबी सर्कल, सातपूर मनपा कार्यालयाजवळ व त्र्यंबकरोडवर पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागले.

धरण                         विसर्ग (क्यूसेक)
दारणा                           850
गंगापूर                          698
वालदेवी                         107
आळंदी                          87
भावली                          135
भाम                              374
वाघाड                           180
पालखेड                       866
नांदूरमध्यमेश्वर             6310
करंजवण                     451
कडवा                         840
तिसगाव                      31
गौतमी गोदावरी          288
काश्यपी                     160

 

 

 

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

25 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

44 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

51 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

1 hour ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago