अतिवृष्टीचा दणका, बळीराजाला फटका!

सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत मागील काही दिवसांत अतिवृष्टी झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचून आहे. यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके ऐन काढणीला आल्यानंतर पिवळी पडत आहेत. त्यामुळे बळीराजा चिंतातुर झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या नुकसानीमुळे आता बळीराजा सरकारकडे आशेने पाहत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना पावसाने झोडपले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे या पावसाने नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील अनेक गावामध्ये सध्या पूरसदृश परिस्थिती आहे. जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यासोबत शेतात पाणी शिरल्याने पिकांची हानी झाली आहे. मोहोळ तालुक्यातील तरट गावात शेतातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आल्याने नदी काठावरची शेती पाण्याखाली गेली. नदीकाठी असलेल्या ऊसासह केळी आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्याचबरोबर विजेच्या मोटारीदेखील पाण्याखाली गेल्या आहेत. प्रशासनाने तातडीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी
केली आहे.

 

 

 

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago