नाशिक

इच्छुक उमेदवारांकडून संभाव्य गट-गणात साखर पेरणी

निफाड तालुक्यात नवीन गट व गण रचनेनुसार होणार आगामी निवडणुका

निफाड : विशेष प्रतिनिधी
न्यायालयाच्या निर्णयानंतर आता जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, ग्रामीण भागात आपले राजकीय वर्चस्व अधोरेखित करणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी जोर धरू लागली आहे. नव्या गट-गण रचनेनुसार आगामी निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी गट व गणाचे मागील काही वर्षांचे आरक्षण गृहीत धरून लोकांच्या भेटीगाठींवर भर देत साखर पेरणी सुरू केली आहे. त्यातून निवडणुकीपूर्वीच मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची वातावरणनिर्मिती सुरू झाल्याचे
चित्र आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांनी ग्रामीण भाग ढवळून निघतो. अलीकडे तरुणांचाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे मोठा ओढा आहे. ग्रामीण भागातील नेतृत्व सिद्ध करण्याची जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक हे एक साधन तरुणांसाठी उपलब्ध आहे. निवडणुकीत आपल्याला संधी मिळाल्यास आपलाच पत्ता कसा ओपन होईल, यासाठी अनेक जण धडपडताना दिसत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तीन-चार वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांत बर्‍याच राजकीय उलथापालथी झाल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीला पक्षातील ज्येष्ठ, युवा नेतृत्वाला सामोरे जावे लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हा परिषद गट आणि गणांत देखील इच्छुकांची तयारी जोरात सुरू आहे. तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये राजकीय वारसदारांचे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

गट-गण रचनेसाठी सूचना
जिल्ह्यातील गट व गण रचनेसाठी शासनाने सूचना जारी केली असून, नियोजन असे : प्रारूप गट-गण रचनेची अधिसूचना प्रसिद्धी- 14 जुलै 2025 पर्यंत. प्रारूप गट-गण रचनेला हरकती- 21 जुलै 2025 पर्यंत. विभागीय आयुक्तांना हरकतींचा प्रस्ताव सादर करणे- 28 जुलै 2025 पर्यंत. विभागीय आयुक्तांकडे हरकतींवर सुनावणी- 11 ऑगस्ट 2025 पर्यंत. अंतिम गट-गण रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे- 18 ऑगस्ट 2025 पर्यंत.

गट-गण निश्चित होण्याची शक्यता
साडेतीन वर्षांपासून लांबलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला अखेर प्रारंभ झाला आहे. राज्याचे ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी राज्यपालांच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना गट, गण प्रारूप रचना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार सर्व जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी 18 ऑगस्टपर्यंत गट-गण रचना निश्चित करून राज्य निवडणूक अधिकारी यांना पाठवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. त्यानंतर आरक्षण निश्चिती होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.

 

Editorial Team

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago