पुलाचा कठडा तोडून कार नाल्यात, 5 जण जखमी
दिंडोरी : प्रतिनिधी
सप्तशृंगगडावरून देवीचे दर्शन घेऊन परतत असलेल्या भाविकांच्या कारला दि. 31 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 12.15 वाजेच्या सुमारास वणी-कळवण मार्गावरील अहिवंतवाडी शिवारात भीषण अपघात झाला. यात पाच भाविक जखमी झाले. अपघातानंतर कारने पुलाचा कठडा तोडून खाली नाल्यात कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून सहा जण वणीच्या दिशेने प्रवास करीत होते. अहिवंतवाडी परिसरातील पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने पुलाचा कठडा तोडला आणि थेट खाली नाल्यात कोसळली. या अपघातात हर्षश्री आहेर (वय 42), देवदास आहेर (वय 47), पुष्कर आहेर (वय 17), गौरव आहेर (वय 13) आणि धोंडाबाई वाळुंज (वय 68, सर्व रा. निफाड) जखमी झाले. काही जखमींच्या डोक्याला मार लागला असून, काहींना हातापायाला फ्रॅक्चर झाले आहे.
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढून मदतकार्य केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार वसंत साबळे करीत आहेत. दरम्यान, नांदुरी- वणी मार्गावर वारंवार होणार्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला साइडपट्ट्यांचा अभाव असून, विशेषतः पुलाजवळ आवश्यक सुरक्षा उपाययोजना नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संबंधित विभागाने तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना करून अपघातप्रवण ठिकाणांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Terrible accident on Wani-Kalvan road; Car falls into drain after breaking bridge, 5 injured
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…
बाजारात गावरान कैर्यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…
कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…
ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…
सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…
इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…