नाशिक

मराठीची परवड थांबेना ;पालकांची मानसिकता बदलेना

 

 

 

 

 

नाशिक :प्रतिनिधी

 

 

मराठी भाषेचा कमी होणारा वापर हे मराठी संस्कृती नष्ट होण्याचे ध्योतक मानले तर वावगे ठरणार नाही. मात्र मराठी संस्कृती टिकण्यासाठी मराठी भाषेचा वापर वाढवणे गरजेचे आहे.  पण दिवसेंदिवस मराठी शाळांची संख्या कमी होत आहे. आणि ज्या मराठी शाळा आहेत त्यांना विद्यार्थी मिळेनात अशी बिकट अवस्था झाली आहे. मात्र या गोष्टीला जसे  सरकारचे धोरण जबाबदार आहे त्याचप्रमाणे पालकांची मानसिकता ही जबाबदार आहे.     मराठी माध्यमात शिक्षण झाले तर आपल्या पाल्याची प्रगती होणार नाही अथवा त्याचे भवितव्य अंधारात जाईल असे गृहित धरून पालक  ऐपत नसतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेत आहेत.  त्यामुळे मराठी शाळांना विद्यार्थी मिळत नाहीत. मात्र यासाठी सरकारने मराठी शाळा टिकाव्यात यासाठी ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

 

 

मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा गुणवत्ता या विषयी लोकांच्या मनातील कमी होत असलेली विश्वासार्हता दूर करणे आवश्यक आहे.

मराठी शाळांमध्ये शिक्षण घेणे म्हणजे इंग्रजीपासून दुर जाणे नाही तर मराठी आत्मसाद करणे आहे हेही पालकांनी समजून घ्यायला हवे. इंग्रजीतून पाल्याचा व्यक्तिमत्व विकास होत असला तरी मानसिक विकास अथवा वैचारिक पातळी वाढवण्यासाठी मातृभाषेचीच आवश्यकता असते.    मुलांना मराठीची गोडी लागण्यासाठी पालकांनी आपल्या मानसिकतेत बदल करत इंग्रजी बरोबर मराठी भाषा शिकवण्यास प्राधान्य द्यावे असे झाले तरच मराठी भाषा रुजेल  टिकेल .

 

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

3 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

3 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

3 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

3 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago