महाराष्ट्र

राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मत

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेतून आमदारांचा एक मोठा गट एकनाथ शिंदेंसोबत असल्यामुळे राज्य सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे रामदास आठवले म्हणाले.
शिवसेनेचे 37 आमदार शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे मोठा गट शिंदेंसोबत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार, अजित पवार यांनी आमच्याकडे बहुमत आहे अशी भूमिका मांडणं अयोग्य आहे. आपल्याला बहुमत सिद्ध करण्याचा अधिकार आहे. पण इतके आमदार वेगळे झालेले असताना बहुमत असूच शकत नाही. त्यामुळे या सरकारला निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असे ते म्हणाले.

आमदारांना निलंबित करू शकत नाही

दरम्यान, शिंदेंसोबत असणार्‍या 16 आमदारांना निलंबित करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं सांगितले जात असले तरी ते शक्य नसल्याचे आठवले म्हणाले. तो अधिकार विधानसभा उपाध्यक्षांना नाही. 37 आमदारांचा गट दोन तृतियांश बहुमताने एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारकीला अजिबात धक्का लागू शकत नाही. व्हीप सभागृहात असतो. बाहेर नसतो. त्यामुळे एखाद्या बैठकीला हजर राहिले नाही, म्हणून त्यांना पक्षातून काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण त्यांची आमदारकी रद्द करण्याचा अधिकार विधानसभा उपाध्यक्षांना नाही. असं त्यांनी नमूद केले. देवेंद्र फडणवीसांसोबत माझी चर्चा झाली आहे. चर्चेत त्यांनी सांगितले की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला हा पक्षांतर्गत वाद आहे. त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही. आम्ही सध्या वेट अँड वॉचमध्ये आहोत. आम्हाला कोणतीही घाई नाही. एकनाथ शिंदेंकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही, अशी माहिती रामदास आठवलेंनी दिली आहे.
दरम्यान, पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसेना कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याच्या प्रकरणावरून रामदास आठवलेंनी टीका केली आहे. रिपाइं एकनाथ शिंदेंबाबत सहानुभूती बाळगून आहे. त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. गेलेले आमदार शिवसेनेकडे परत येतील अशी परिस्थिती अजिबात नाही. तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर तुम्ही करू शकता. पण दादागिरी करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. दादागिरीचं उत्तर दादागिरीनं दिलं जाऊ शकतं. एकनाथ शिंदेंवर अन्याय होत असले, तर माझ्या पक्षाचे लोक त्यांच्यासोबत राहतील, असं आठवले म्हणाले आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

10 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

10 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

11 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

11 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

11 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

11 hours ago